शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहनातून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: March 28, 2017 12:38 IST

खंडाळ्यातील चित्र : पुणे-बेंगलोर महामार्गावर धोक्याची घंटा; ठोस उपाययोजनेची गरज

आॅनलाईन लोकमत

खंडाळा : पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा येथील बसस्थानकात लांब पल्ऱ्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे . महामार्गावरच अनेक प्रवाशी वाहनांची प्रतीक्षा करत उभे राहतात. त्यामुळे भरधाव वेगाच्या वाहनांचा धोका पत्करून प्रवाशांना जीव मुठीत धरुन एसटी बसची वाट पहावी लागते. बसअभावी अनेकदा धोकादायक वाहनातूनही प्रवास करण्याचे धाडस प्रवाशी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

खंडाळा येथील बसस्थानक हे महामार्गावरील उड्डाणपूलाच्या शेजारीच आहे . स्थानिक गावांना जाणाऱ्या बसेस तसेच वाई, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी जाणाऱ्याच गाड्या बसस्थानकात येतात. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, कऱ्हाड, कोल्हापूर, सांगली यासारख्या इतर शहारात जाणाऱ्या प्रवाशांना हायवेवरच एसटीसाठी उभे रहावे लागते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी महामार्गावर मोठी गर्दी पहायला मिळते. एसटी बस येथेही हात दाखवूनच थांबवावी लागते त्यासाठी अनेकदा प्रवाशी रस्त्यावरच उभे असतात. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या इतर वाहनांचा धोका संभवतो. उड्डाण पूलाच्या बाजूलाच अनेक प्रवासी उभे राहत असल्याने खंडाळा शहरात येणाऱ्या वाहनांनाही अडचण निर्माण होते. मात्र, याकडे महामार्गा प्राधिकरण व पोलिस प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.

महामार्गावरही एसटी बस न मिळाल्यास रॉकेल, डिझेल, एलपीजी गॅस, रासायनिक द्रव्ये, घरगुती गॅस सिलिंडर असे ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या गाड्यातूनही प्रवास केला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका आहे. धोकादायक वाहनातून हा प्रवास दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असतो, मात्र याकडेही डोळेझाक केली जाते .महामार्गावरून जाणाऱ्या विना वाहक एसटी बस सोडून इतर सर्व बसेस खंडाळा बसस्थानकात आल्यास हायवेवर उभे राहण्याचे प्रमाण कमी येईल मात्र यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे .(प्रतिनिधी)अनेकांना गमवावा लागलाय जीव !

खंडाळा येथे महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अपघाताच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वषार्पूर्वी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने आठ प्रवाशांना जागीच चिरडले होते. त्यावेळी हायवेकडेला उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना बंदी करण्यात आली होती. मात्र ती घटना ताजी असतानाही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.