शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

उपोषण बारामतीत;अस्वस्थता साताऱ्यात

By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST

धनगर समाज आंदोलन : मंत्रालयातील बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ

खंडाळा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी लाखो समाजबांधव भर पावसातही बारामतीत तळ ठोकून आहेत. कित्येक दशकांचा अन्याय विधानसभेच्या तोंडावर आग ओकू लागला आहे. यामुळे एकीकडे तीव्र आंदोलन तर दुसरीकडे मंत्रालयात सर्व मंत्र्यांच्या भेटी आणि चर्चा यामुळे धनगर समाजाच्या या आंदोलनाने निर्णायक वळण घेतले आहे. ‘आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच,’ असा दृढनिश्चय करून महाराष्ट्रातून एकवटलेल्या धनगर समाजाने योग्य निर्णय न झाल्यास आघाडी सरकारचेच ग्रह फिरविण्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या आंदोलनात खंडाळा तालुक्यातील शेकडो तर जिल्ह्यातील हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला आहे. आरक्षणाच्या मागणीचा पहिला आवाज हा खंडाळा तालुक्यातील तहसील कचेरीवर काढलेल्या मोर्चापासून झाला. बारामतीच्या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता हे आंदोलनकर्ते आरक्षणाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षभेद आणि संघटना विसरून केवळ समाजावर आजतागायत झालेल्या अन्यायाला वाचा फोडून अवघा समाज एकवटल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून या समाजाचे नेतृत्व करणारे शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे, खंडाळा पंचायत समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील, कऱ्हाडचे रमेश लवटे यांनी गुरुवारी रामराजे नाईक-निंबाळकर आणि बाळासाहेब थोरात, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मंत्रालयात भेट घेऊन आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यामुळे एकीकडे तीव्र आंदोलन तर दुसरीकडे मंत्र्यांच्या गाठीभेटी असे दुहेरी दबाव सरकारवर आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यावेळी योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत शासनाविरोधी मतदान करण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे सरकार आदिवासींची आरक्षण टक्केवारी अबाधित ठेवून सवलती जाहीर करणार की, आहे त्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषण जरी बारामतीत असले तरीही सातारा जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जमातीचे आरक्षण हा धनगर समाजाचा न्याय हक्क आहे. गेली साठ वर्षे आमच्यावर अन्याय झाला आहे. आजपर्यंत शांत बसलेला हा समाज जागृत झाला आहे. केवळ शब्दांच्या खेळात सवलतींपासून समाजाला दूर राहावे लागले आहे. त्यामुळे काही झाले तरी आरक्षण आम्ही मिळवूच. त्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.- रमेश धायगुडे-पाटीलसदस्य जिल्हा नियोजन मंडळभारतीय घटनेत धनगर समाजाला एसटीच्या सवलती दिल्या आहेत. केवळ राज्य शासनाने त्या लागू केल्या नाहीत. आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीररीत्या कोणतीही अडचण वाटत नाही. त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईल, तसे न झाल्यास समाजाच्या वतीने सुप्रिम कोर्टात लढण्याची सर्वांचीच मानसिकता आहे. समाजाला न्याय मिळण्याची हीच योग्य वेळ आहे.- अ‍ॅड. सचिन धायगुडे