शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीला ‘लेखणी’चा उपवास!

By admin | Updated: July 15, 2016 22:41 IST

जिल्हा परिषद : कर्मचारी कामावर हजर मात्र काम पडले बंद; जिल्ह्यातील सहाशे कर्मचाऱ्यांचा सहभाग

सातारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आषाढी एकादशीनिमित्त जणू ‘लेखणी’ने उपवास धरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्मचारी कामावर हजर राहिले; मात्र त्यांनी आपली लेखणी बंद ठेवली. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेबाहेर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दुपारी दोन वाजता द्वारसभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांमध्येही कामकाज ठप्प राहिले.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने हे लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून दि. १५ जुलैपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीतील लिपिकवर्गीय कर्मचारी यात सहभागी होणार आहे. त्याचा दैनंदिन कामाजाला फटका बसला.जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर संघटना मजबूत करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये गे्रड पे सुधारणा, प्रशासकीय बदल्यांचे अन्यायकारण धोरण, अतिकालिक भत्ता मिळणे, पदवीधर वेतन श्रेणी लागू होणे, निमशासकीय कर्मचाऱ्यांऐवजी शासकीय कर्मचारी म्हणून संबोधले जावे, अशा पंधरा मागण्या आहेत.जिल्हाभरातील तब्बल ६०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सातारा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या लिपिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. १५ जुलैपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलनात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी भाग घेतला असून, सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प झाले.सकाळी कार्यालय सुरू होतेवेळी जिल्हा परिषदेतील तसेच इतर पंचायत समितीमधील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व हे आंदोलन का करावे लागत आहे. याबाबत काका पाटील, प्रशांत तुपे, जितेंद्र देसाई, नितीन खटावकर, विलासराव शितोळे, दिनकर चव्हाण, शिवाजीराव साळुंखे, चंद्रकांत मोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी २ वाजता प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला. तसेच हे आंदोलन शासन मागण्या मान्यकरेपर्यंत बेमुदत सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कऱ्हाड-पाटणला प्रतिसादजिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनाला कऱ्हाड व पाटण पंचायत समित्यांतील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. कर्मचाऱ्यांनी दिवसभर प्रवेशद्वाराशेजारी ठिय्या आंदोलन करीत आमच्या मागण्या मान्य करा, अशा आशयाच्या घोषणा दिल्या. कऱ्हाडमध्ये तालुकाध्यक्ष राजेंद्र किळुस्कर, उपाध्यक्ष दीपक कराळे या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले. पाटण येथे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष भालचंद्र शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष जवाहर पवार, संघटक इस्माईल अवटे, उपाध्यक्ष इलाई यांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दिला पाठिंबाराज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यानी पूर्ण पाठिंबा दिलेला असल्याने सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बांधकाम, ल. पा. अंगणवाडी आदी कायार्यातील लिपिकांकडील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण ७५० लिपिकवर्गीय कर्मचारी यामध्ये सामील झालेले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे व उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आंदोलनावेळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारची मानसिकता दिसत नाही. निवेदने देऊनही त्याची दखल घेत नाहीत. लाक्षणिक उपोषण केल्यानंतर सकारात्मक चर्चा केली; पण कार्यवाही काहीच नाही. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन मागे घेऊ नये, अशी कर्मचाऱ्यांचीच मागणी आहे. - जितेंद्र देसाई, राज्य संघटक, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना.