शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

वरकुटे-मलवडी : गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असून, ...

वरकुटे-मलवडी :

गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक असून, ऐन पावसाळ्यात लोधवडे, गंगोती, मासाळवाडी येथील तलावांत ठणठणाट आहे. तर जांभुळणीसह माण पूर्व भागात असणाऱ्या इतर तलावांतही केवळ दहा टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाही पुरेसा पाऊस होऊन सर्व तलाव भरतील, अशी अपेक्षा माणवासीयांनी व्यक्त केली होती. मात्र कधी-कधी माणवासीयांना पावसाच्या लहरीपणाचा फटका बसून लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, गेल्या दोन वर्षांत पडलेल्या पावसाला पाणी फाऊंडेशनच्या बळाची अन् जलसंधारणाची साथ मिळाल्याने सध्या परिस्थितीत बदल दिसत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वत्र पाणीसाठे 'ओव्हरफ्लो' झाले होते. त्यामुळे यंदाही दुष्काळाच्या धगीपासून लोकांची सुटका झाली. मे महिन्यात काही भागात अवकाळी तर सर्वत्र झालेल्या वळवाच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला होता. मात्र, काही शेतकऱ्यांना नुकसानीचा फटकाही सोसावा लागला.

तालुक्यातील गावोगावी झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पावसाचे पाणी ज्या-त्या भागात साचून राहिल्याने अद्याप मोठ्या जलसाठ्यांपर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे तलावांतील पाणीपातळी घटत गेली आहे. सध्या सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असला तरी माण तालुक्यातील लोधवडे, गंगोती, मासाळवाडी येथील तलाव अजूनही कोरडे आहेत. तर जांभूळणी,जाशी व ढाकणी तलावांत दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला आहे. आंधळीसह पिंगळी व राणंद तलावात पुरेसा पाणीसाठा आहे. पिंगळीच्या तलावात ५२ टक्के पाणीसाठा आहे तर आंधळी तलावात ३७.५५ तर राणंदमध्ये २५ टक्केच वापरण्यायोग्य पाणीसाठा आहे. यंदा पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्व तलाव लवकरच भरण्याची शक्यता आहे.

वरकुटे मलवडी

फोटो : वरकुटे-मलवडीतील पडळकर तलावात दहा टक्के पाणीसाठा उरलेला आहे.