शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

खटाव : अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर, तर हातातोंडाशी येत असलेले रब्बी पीक या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. रब्बी हंगामातील ...

खटाव : अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातुर, तर हातातोंडाशी येत असलेले रब्बी पीक या वातावरणामुळे धोक्यात आले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, कांदा, आदी पिकांवर या वातावरणाचा परिणाम होत असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. या आधी वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. धुक्यामुळे गव्हावर तांबेरा, हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर कांद्यावर करपा व टाका रोग पडल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा औषधे फवारणीकरिता कंबर कसावी लागणार आहे. थंडीला सुरुवात झाल्यामुळे रब्बी पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. रब्बी पिकाच्या आशाही पल्लवित झाल्या होत्या; परंतु अचानक पावसाळी वातावरण व पडलेला पाऊस या आगाप असलेल्या ज्वारी पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक जोमात येऊन सुद्धा या वातावरणामुळे कोमात जाण्याची भीती शेतकऱ्याला लागली असून, या पिकांना वाचविण्यासाठी आता कृषीच्या दुकानात कीटकनाशक औषधे खरेदीसाठी शेतकऱ्याची गडबड सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकऱ्याचे तोंडचे पाणी पळविले आहे, तर रब्बीच्या आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

०६खटाव पीक

फोटो : अवकाळी पावसामुळे खटावमधील बहुतांश शेतातील ज्वारी पिके आडवी झाल्याने रब्बी ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.