शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

By admin | Updated: February 25, 2015 00:08 IST

अपेक्षेवर पाणी : चांगले पैसे मिळतील म्हणून घरात रचून ठेवली होती पोती

कोपर्डे हवेली : सोयाबीन काढणीच्या हंगामात दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता दर वाढेल यासाठी सोयाबीनची पोती घरामध्येच रचून ठेवली. मात्र, सध्या दर वाढण्याऐवजी घसरत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. यावर्षीचा सोयाबीन हंगाम अनेक गोष्टींमुळे अडचणीत आला होता. प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. परीणामी, सोयाबीनला चांगला दर मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. सोयाबीन काढणीपूर्वी सुमारे ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रूपये क्विंटलचा दर होता. हंगामाच्या काढणीवेळी तो दर २ हजार ८०० रूपये ते ३ हजार रूपयेवर आला होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सोयाबीन पिकाच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोयाबीन बियाणे दुप्पटीने महागले आहे. तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सरासरी एकरी ७ ते ८ क्विंटल सोयाबीन शेतकरी काढतात. ते उत्पादन यावर्षी ३ ते ४ क्विंटलवर आले असल्याने आणि दरात वाढ होत नसल्याने सोयाबीनची शेती तोट्यात आली आहे. गत महिन्यामध्ये सोयाबीनचा दर क्विंटलला ३ हजार ३०० रूपये होता. दर वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, वाढण्याऐवजी गेल्या आठवड्यापासून दर उतरले आहेत. ३ हजार रूपये क्विंटलचा सोयाबीनचा दर झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये विक्रीसाठी शिल्लक ठेवले आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून बसला आहे. दर वाढण्याऐवजी दर कमी होत असल्याने शिल्लक सोयाबीनचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (वार्ताहर)सोयाबीनला ५ हजार रूपये क्विंटलप्रमाणे दर मिळाला पाहिजे. तरच सोयाबीन पिकाचे उत्पादन परवडेल. दरात वाढ होण्याऐवजी दर घसरत असल्याने शिल्लक ठेवलेल्या सोयाबीनचे काय करायचे असा आमच्यापुढे प्रश्न आहे. - जगन्नाथ चव्हाण, कोपर्डे हवेली