शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

वाई तालुक्यात ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने ...

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने नेला नसल्याने ऊसाला तुरे फुटलेले दिसत आहेत. ऊसाला तुरा फुटल्याने वजनात घट होऊन उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अहोरात्र कष्ट करूनही पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.

वाई तालुका ऊस, आले, हळद व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर तालुक्यांच्या मानाने तालुका सधन मानला जातो. किसनवीर साखर कारखाना याच तालुक्यात असल्याने शेतकरी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत असतात. या तालुक्यातील बागायती शेतकऱ्यांचे ऊस हेच पीक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाहीत. अतिवृष्टीमुळे यावर्षी ऊसाच्या पिकाला कालावधीपूर्वीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार असून, बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस घेऊन जावा, अन्यथा तालुक्यातील शेतकरी संघर्षाच्या तयारीत आहे.

खरीप हंगामातील ऊस, हळद सोडून सर्व पिके वाया गेल्याने बळीराजाची सर्व भिस्त सध्या ऊसावर आहे. त्यालाच तुरे फुटल्याने ऊसाचे वजन कमी भरून पोकळ बांबू तयार झाला आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्वारी पिकाने ओढ दिल्यास शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊसावरच अवलंबून राहतो. तुरे आल्याने जनावरांचा चाराही धोक्यात आल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे. तरीही शेतकरी हा खोट्या आशेवर जगत असून, ऊसावर मोठी भिस्त ठेवून असतो. वाई तालुक्यात सध्या ऊसाच्या लागवडीला जोर आला असून, शेतात सध्या शेतकरी हा ऊसाची लागवड करताना दिसत आहे. याबाबत कारखान्याने वेळेत ऊसाची तोड करावी व तालुक्यातील बळीराजाला धीर देण्याचे काम करावे. ऊस हे श्रीमंताचे पीक असल्याचे मानले जाते; परंतु या पिकासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

चौकट...

बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार

खते, बियाणे, शेताची मशागत, मजूर, लागणारे पाणी यासाठी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज काढतो. त्याचे व्याजही काहीवेळा निघत नाही. तरीही ऊसाच्या अंतर्गत होणाऱ्या इतर पिकांच्या उत्पन्नात समाधान मानून बळीराजा हे धाडस करताना दिसत आहे, अन्यथा साखर कारखाने व निसर्ग यांच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन बळीराजा अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, तरी ऊसाला तुरे आल्याने त्वरित ऊसाची तोड करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे अशीही मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार आहेत.