शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने ...

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने नेला नसल्याने ऊसाला तुरे फुटलेले दिसत आहेत. ऊसाला तुरा फुटल्याने वजनात घट होऊन उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अहोरात्र कष्ट करूनही पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.

वाई तालुका ऊस, आले, हळद व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर तालुक्यांच्या मानाने तालुका सधन मानला जातो. किसनवीर साखर कारखाना याच तालुक्यात असल्याने शेतकरी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत असतात. या तालुक्यातील बागायती शेतकऱ्यांचे ऊस हेच पीक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाहीत. अतिवृष्टीमुळे यावर्षी ऊसाच्या पिकाला कालावधीपूर्वीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार असून, बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस घेऊन जावा, अन्यथा तालुक्यातील शेतकरी संघर्षाच्या तयारीत आहे.

खरीप हंगामातील ऊस, हळद सोडून सर्व पिके वाया गेल्याने बळीराजाची सर्व भिस्त सध्या ऊसावर आहे. त्यालाच तुरे फुटल्याने ऊसाचे वजन कमी भरून पोकळ बांबू तयार झाला आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्वारी पिकाने ओढ दिल्यास शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊसावरच अवलंबून राहतो. तुरे आल्याने जनावरांचा चाराही धोक्यात आल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे. तरीही शेतकरी हा खोट्या आशेवर जगत असून, ऊसावर मोठी भिस्त ठेवून असतो. वाई तालुक्यात सध्या ऊसाच्या लागवडीला जोर आला असून, शेतात सध्या शेतकरी हा ऊसाची लागवड करताना दिसत आहे. याबाबत कारखान्याने वेळेत ऊसाची तोड करावी व तालुक्यातील बळीराजाला धीर देण्याचे काम करावे. ऊस हे श्रीमंताचे पीक असल्याचे मानले जाते; परंतु या पिकासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

चौकट...

बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार

खते, बियाणे, शेताची मशागत, मजूर, लागणारे पाणी यासाठी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज काढतो. त्याचे व्याजही काहीवेळा निघत नाही. तरीही ऊसाच्या अंतर्गत होणाऱ्या इतर पिकांच्या उत्पन्नात समाधान मानून बळीराजा हे धाडस करताना दिसत आहे, अन्यथा साखर कारखाने व निसर्ग यांच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन बळीराजा अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, तरी ऊसाला तुरे आल्याने त्वरित ऊसाची तोड करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे अशीही मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार आहेत.