शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कर्जामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: October 13, 2015 23:59 IST

शशिकांत शिंदे : मंत्री केवळ मतदारसंघापुरतेच उरले असल्याची टीका

पुसेगाव : ‘शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. राज्याच्या विकासासाठी शासनाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. राज्यातील मंत्री हे राज्याचे मंत्री राहिले नसून ते स्वत:च्या मतदारसंघापुरते राहिले आहेत. त्यांच्या मतभेदांचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार आहे,’ अशी टीका माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.मोळ येथे नूतन ग्रामपंचायत व सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, वडूज मार्केट कमिटीचे सभापती सुनील घोरपडे, सतीश फडतरे, श्रीमंत झांजुर्णे, खरेदी-विक्री संघाचे संचालक डॉ. आनंदराव भोसले, मनोज गोडसे, पांडूरंग गोडसे, सरपंच सुप्रिया वाघ, उपसरपंच मोहन घाटगे, सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत घोरपडे, उपाध्यक्ष विजय भंडलकर, दिलीपराव काळंगे, किसनराव वाघ, जगन्नाथ घाटगे उपस्थित होते. आमदार शिंंदे म्हणाले, ‘दुष्काळाच्या छायेत आपला शेतकरी कसे जीवन जगत असेल याविषयी तळमळ असल्यामुळे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खटाव-माणसह मराठवाड्याचा दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळी शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलने ही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुष्काळी भागाचा दौरा करण्याचा दिखावा केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ठोस मदत त्यांनी जाहीर केली नाही.’ (वार्ताहर)सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला ‘आघाडी शासनाने यशस्वीपणे राबविलेल्या योजनांची केवळ नावे बदलून राज्यातील भाजप-शिवसेना सरकार नवीन योजना म्हणून राबवित आहे. राज्यातील या सरकारला एक वर्षे पूर्ण होत आली तरी अद्यापही ठोस विकासकामे दिसत नाहीत. राज्यातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याची स्वप्ने दाखून सत्तेवर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीकाही यावेळी आमदार शिंदे यांनी केली.