शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

२७ सोसायट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जाचा जाच!

By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST

कोरेगाव तालुका : शासनाच्या आदेशाबाबत संभ्रम; अनेकजण वंचित राहण्याची शक्यता

वाठार स्टेशन : मागील ३ वर्षांतील दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्याला सावरण्यासाठी ५० पैसे आणेवारी असलेल्या सर्वच गावांतील पीक कर्जाचे ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; मात्र त्याबाबत कोणताही अधिकृत आदेश दिला नाही. त्यामुळे पुनर्गठनाच्या प्रतीक्षेत बसलेल्या कोरेगाव तालुक्यातील २७ गावांतील विकास सेवा सोसायट्यांतील शेतकरी सभासद अडचणीत सापडला आहे. २०१५ च्या खरीप हंगामात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे ५ वर्षांसाठी पुनर्गठन करताना पहिल्या वर्षीचे व्याज माफ करण्यात येणार आहे. तर पुढील ४ वर्षांत या कर्जाचे ६ टक्केचे व्याज सरकार भरणार, असा निर्णय राज्य सरकारने महिनाभरापूर्वीच जाहीर केला होता. त्यामुळे अनेक सभासद शेतकरी याबाबत गाफिल राहिले. कोरेगाव तालुक्यातील जवळजवळ २७ गावांतील विकास सेवा सोसायट्यांतील शेतकऱ्यांनी घेतलेले हे रूपांतरीत पीक कर्ज ३० जूनपर्यंतच्या मुदतीत भरणे गरजेचे असतानाही ते शासनाच्या या आदेशामुळे भरले नाही. त्यामुळे आता या २७ सोसायट्यांची ४४ कोटींचे रूपांतरीत कर्ज रक्कम जिल्हा बँकेत वेळेत जमा होऊ शकली नाही. त्यामुळे आता या सर्वच सोसायट्यांमधील कर्जदारांना बँकेच्या विविध सवलत व योजनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तर काही सोसायट्यांची आता निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने या थकित सभासदास मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी चिंतेचाच विषय...शासनाने जारी केलेल्या पुनर्गठनमध्ये केवळ खरीप पिकांचा उल्लेख केला आहे. मात्र, सातारा जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात ऊस, हळद, आले ही बागाईत पिके आहेत. या पिकावरच शेतकरी रूपांतरीत कर्ज घेत आहे. त्यामुळे ५० पैसे आणेवारी असूनही शासनाच्या या योजनेचा लाभ जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांना होणार? हा चिंतेचाच विषय आहे.शासनाच्या पुनर्गठन आदेशाबाबत संभ्रम असताना कोरेगावच्या दुय्यम निबंधकांच्या गाफिलपणामुळेच जिल्हा बँकेची रूपांतरीत कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शासनाचा कोणताही लेखी आदेश त्यांच्याकडे नसताना सचिवांना त्यांनी वसुलीबाबत उलट-सुलट सूचना दिल्यामुळेच आज बँकेची ४४ कोटी रकमेची वसुली होऊ शकली नाही. यामुळे सभासद शेतकऱ्यांना आता बँकेच्या विविध लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे.- नितीन पाटील, संचालक, सातारा जिल्हा बँक कोरेगाव तालुक्यात ९० लाखांचे पुनर्गठन शासकीय निकषानुसार केले आहे. तालुक्यातील २७ विकास सेवा सोसायट्यांच्या कोणत्याही सचिवास मी पुनर्गठन करू नये, अशा सूचना दिलेल्या नाहीत.- युसूफ शेख, दुय्यम निबंधक, कोरेगाव