शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
3
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
4
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
5
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
6
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
7
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
9
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
10
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
11
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
12
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
13
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
14
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
15
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
16
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
17
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
18
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
19
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
20
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

२७ सोसायट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जाचा जाच!

By admin | Updated: July 7, 2016 00:49 IST

कोरेगाव तालुका : शासनाच्या आदेशाबाबत संभ्रम; अनेकजण वंचित राहण्याची शक्यता

वाठार स्टेशन : मागील ३ वर्षांतील दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्याला सावरण्यासाठी ५० पैसे आणेवारी असलेल्या सर्वच गावांतील पीक कर्जाचे ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; मात्र त्याबाबत कोणताही अधिकृत आदेश दिला नाही. त्यामुळे पुनर्गठनाच्या प्रतीक्षेत बसलेल्या कोरेगाव तालुक्यातील २७ गावांतील विकास सेवा सोसायट्यांतील शेतकरी सभासद अडचणीत सापडला आहे. २०१५ च्या खरीप हंगामात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचे ५ वर्षांसाठी पुनर्गठन करताना पहिल्या वर्षीचे व्याज माफ करण्यात येणार आहे. तर पुढील ४ वर्षांत या कर्जाचे ६ टक्केचे व्याज सरकार भरणार, असा निर्णय राज्य सरकारने महिनाभरापूर्वीच जाहीर केला होता. त्यामुळे अनेक सभासद शेतकरी याबाबत गाफिल राहिले. कोरेगाव तालुक्यातील जवळजवळ २७ गावांतील विकास सेवा सोसायट्यांतील शेतकऱ्यांनी घेतलेले हे रूपांतरीत पीक कर्ज ३० जूनपर्यंतच्या मुदतीत भरणे गरजेचे असतानाही ते शासनाच्या या आदेशामुळे भरले नाही. त्यामुळे आता या २७ सोसायट्यांची ४४ कोटींचे रूपांतरीत कर्ज रक्कम जिल्हा बँकेत वेळेत जमा होऊ शकली नाही. त्यामुळे आता या सर्वच सोसायट्यांमधील कर्जदारांना बँकेच्या विविध सवलत व योजनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तर काही सोसायट्यांची आता निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने या थकित सभासदास मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी चिंतेचाच विषय...शासनाने जारी केलेल्या पुनर्गठनमध्ये केवळ खरीप पिकांचा उल्लेख केला आहे. मात्र, सातारा जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात ऊस, हळद, आले ही बागाईत पिके आहेत. या पिकावरच शेतकरी रूपांतरीत कर्ज घेत आहे. त्यामुळे ५० पैसे आणेवारी असूनही शासनाच्या या योजनेचा लाभ जिल्ह्यातल्या किती शेतकऱ्यांना होणार? हा चिंतेचाच विषय आहे.शासनाच्या पुनर्गठन आदेशाबाबत संभ्रम असताना कोरेगावच्या दुय्यम निबंधकांच्या गाफिलपणामुळेच जिल्हा बँकेची रूपांतरीत कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शासनाचा कोणताही लेखी आदेश त्यांच्याकडे नसताना सचिवांना त्यांनी वसुलीबाबत उलट-सुलट सूचना दिल्यामुळेच आज बँकेची ४४ कोटी रकमेची वसुली होऊ शकली नाही. यामुळे सभासद शेतकऱ्यांना आता बँकेच्या विविध लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे.- नितीन पाटील, संचालक, सातारा जिल्हा बँक कोरेगाव तालुक्यात ९० लाखांचे पुनर्गठन शासकीय निकषानुसार केले आहे. तालुक्यातील २७ विकास सेवा सोसायट्यांच्या कोणत्याही सचिवास मी पुनर्गठन करू नये, अशा सूचना दिलेल्या नाहीत.- युसूफ शेख, दुय्यम निबंधक, कोरेगाव