शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञान अन् वाण वापरावे : डॉ. शरद गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST

कुडाळ : आधुनिक काळात शेतीव्यवसाय बदलत आहे. शेतकऱ्यांनी याची दखल घेत आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. सुधारित तंत्रज्ञानाच्या ...

कुडाळ : आधुनिक काळात शेतीव्यवसाय बदलत आहे. शेतकऱ्यांनी याची दखल घेत आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच पिकांसाठी तयार होणाऱ्या नवीन वाणाचा उपयोग करून अधिक उत्पादन घ्यावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे माजी संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.

राज्यस्तरीय रब्बी पीक स्पर्धा २०२० च्या विजयी शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून सोनगाव ता. जावली येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

सन २०२० मधील राज्यस्तरीय रब्बी हंगाम ज्वारी पीक स्पर्धेतील राज्यात प्रथम येणाऱ्या साहेबराव मन्याबा चिकणे, सोनगाव व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्यावतीने डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ विद्यापीठाचे प्रकाशन कृषी दर्शनी आणि रेवती वाणाचे बियाण्यांची एक बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जावली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदीप शिंदे, शशिकला किर्वे, सरपंच सोनगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, नारायण शिंदे, ज्ञानदेव जाधव, किरण बर्गे, विक्रम मोहिते, शांताराम इंगळे, पांडुरंग खाडे, भानुदास चोरगे, सोनगव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख व उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांनी मार्गदर्शन केले. प्रा. मोहन शिर्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेश बाबर सूत्रसंचालन केले तर भूषण यादगीरवार यांनी आभार मानले.

चौकट

कृषी विद्यापीठ, राहुरी येथून ज्वारी सुधार प्रकल्पातील ज्वारी पैदासकार, कीटकशास्त्रज्ञ, रोगशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान तसेच विकसित वाण यावर मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कायम मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामुळेच रब्बीच्या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकतम उत्पादन घेण्याचा बहुमान मिळवला आहे. यासाठी फिल्डवर मार्गदर्शन करणाऱ्या कृषी सहाय्यक भानुदास चोरगे व मनोज पाटील यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.