शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वीज कंपनीच्या नवीन योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : ढोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST

मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी ...

मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता

हणमंत ढोक यांनी केले आहे.

ढोक म्हणाले, ‘शेती पंपासाठी तातडीने नवीन वीज जोडणी देणे. ज्या शेतकऱ्यांना विद्युत मोटर जोडणी करावयाची आहे व ज्यांना पोलची गरज लागत नाही अशा शेतकऱ्यांनी अर्ज केला की त्याच दिवशी वीज कनेक्शन जोडून दिले जाईल. मात्र त्या डीपीवर विद्युत भार शिल्लक असणे गरजेचे आहे. वीज बिल माफी संदर्भामध्येही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला आहे. शेतकऱ्याचे आजपर्यंत थकीत असलेले रकमेवर जे व्याज अधिक दंड आकारले गेले आहे ते माफ करण्यात येणार आहे. मूळ मुद्दलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यास त्यांचा मागील हिशेब पूर्ण करण्यात येईल. या योजनेमध्ये साधारणपणे शेतकऱ्याचा ६० ते ६५ टक्के फायदा होणार आहे. याशिवाय थकीत वीज बिल ज्या गावात भरले जाईल त्याच्या ३३ टक्के रक्कम त्याच गावातील नवीन खांब बसवणे, डीपी बसवणे, जागा विकत घेणे आदी विविध समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जमा रकमेचा विजेसाठी कसा विनियोग करावा हे त्या गावातील सरपंच, त्या कार्यकारी अभियंता वडूज व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या चर्चेतून व जनतेला विश्वासात घेऊन करण्यात येणार आहे..

मायणीसह धोंडवाडी, गुंडेवाडी व चितळी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी, मायणीचे सहायक

अभियंता विशाल नाटकर

उपस्थित होते.