शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

नेरच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

खटाव : ‘नेर तलावातील पाणी साठ्यातून लाभक्षेत्रातील २८ गावांतील एकूण २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नेर तलाव ...

खटाव : ‘नेर तलावातील पाणी साठ्यातून लाभक्षेत्रातील २८ गावांतील एकूण २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. उन्हाळी पिकाच्या शेती सिंचनासाठी हे पाणी उजव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. नेर तलावाच्या शेती सिंचन क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी सारा भरून सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सु. मो. खाडे यांनी केले.

खटावमधील शेतकऱ्यांना नेर तलावातील पाणी येरळा नदीत व दोन्ही कॅनॉलला सोडताना येत असलेल्या प्रमुख अडचणी तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पाणीसारा भरला नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला काही अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात खाडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, अशोक कुदळे, किसन मोरे, उमेश भिसे, रमेश शिंदे, चरण बोबडे, दीपक घाडगे, कालवा निरीक्षक अमोल लेंभे, कालवा निरीक्षक शकील पठाण आदींसह नदीकाठचे सर्व विहीर, बोर मालक ग्रामपंचायत हॉलमध्ये उपस्थित होते.

यावेळी राहुल पाटील यांनी वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्याला पाणीसारा भरूनही पाणी मिळाले नसल्यामुळे शेतकरी पाणी सारा भरावयास तयार नाहीत. अद्याप काही ठिकाणी कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि ते होत नसल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाणही अधिक आहे. पाटबंधारे विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताळमेळ व समन्वय नसल्यामुळे पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन होत नसल्याचे सांगितले.

पाणी वाटप संस्था स्थापन करून शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाटप करावे. शासनाच्या धोरणानुसार कालवा दुरुस्तीचे तसेच बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता प्रस्ताव दिले असले, तरी जर सिंचन प्रकल्पात असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांकडून महसूल गोळा होत नसेल, तर दुरुस्ती खर्च करताना अडचणी येतात. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पाणीसारा रूपात महसूल जमा करणे बंधनकारक असल्याचे खाडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाणी सारा भरण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे मत उमेश भिसे यांनी व्यक्त केले.

11खटाव

नेर तलावातील पाणी डाव्या कालव्यात व नदी पात्रात सोडण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना उपविभागीय अभियंता खाडे. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.