शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:09 IST

खटाव : ‘नेर तलावातील पाणी साठ्यातून लाभक्षेत्रातील २८ गावांतील एकूण २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नेर तलाव ...

खटाव : ‘नेर तलावातील पाणी साठ्यातून लाभक्षेत्रातील २८ गावांतील एकूण २ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. उन्हाळी पिकाच्या शेती सिंचनासाठी हे पाणी उजव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. नेर तलावाच्या शेती सिंचन क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी सारा भरून सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सु. मो. खाडे यांनी केले.

खटावमधील शेतकऱ्यांना नेर तलावातील पाणी येरळा नदीत व दोन्ही कॅनॉलला सोडताना येत असलेल्या प्रमुख अडचणी तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पाणीसारा भरला नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला काही अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात खाडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, अशोक कुदळे, किसन मोरे, उमेश भिसे, रमेश शिंदे, चरण बोबडे, दीपक घाडगे, कालवा निरीक्षक अमोल लेंभे, कालवा निरीक्षक शकील पठाण आदींसह नदीकाठचे सर्व विहीर, बोर मालक ग्रामपंचायत हॉलमध्ये उपस्थित होते.

यावेळी राहुल पाटील यांनी वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्याला पाणीसारा भरूनही पाणी मिळाले नसल्यामुळे शेतकरी पाणी सारा भरावयास तयार नाहीत. अद्याप काही ठिकाणी कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि ते होत नसल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाणही अधिक आहे. पाटबंधारे विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताळमेळ व समन्वय नसल्यामुळे पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन होत नसल्याचे सांगितले.

पाणी वाटप संस्था स्थापन करून शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाटप करावे. शासनाच्या धोरणानुसार कालवा दुरुस्तीचे तसेच बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता प्रस्ताव दिले असले, तरी जर सिंचन प्रकल्पात असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांकडून महसूल गोळा होत नसेल, तर दुरुस्ती खर्च करताना अडचणी येतात. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पाणीसारा रूपात महसूल जमा करणे बंधनकारक असल्याचे खाडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाणी सारा भरण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे मत उमेश भिसे यांनी व्यक्त केले.

11खटाव

नेर तलावातील पाणी डाव्या कालव्यात व नदी पात्रात सोडण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना उपविभागीय अभियंता खाडे. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.