शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तोड होणाऱ्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवावा

By admin | Updated: December 1, 2015 00:12 IST

शिवेंद्रसिंहराजे : कोंडवे येथील शेतकरी मेळाव्यात आवाहन

सातारा : चालूवर्षी योग्य वेळी व योग्य प्रमाणात पर्जन्यमान न झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून, या अवर्षण परिस्थितीत चालू गळीत हंगाम २०१५-१६ मध्ये ऊस तुटून गेल्यानंतर पाण्याअभावी इतर कोणत्याही पिकाचे नियोजन शक्य नसल्यामळे ऊसतोडणी झाल्यावर फक्त ऊस पिकाचा जास्तीत जास्त खोडवा ठेवणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याने तोड होणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा, असे आवाहन अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व संचालक मंडळाच्या आदेशानुसार अवर्षण परिस्थितीत ऊसपीक जोपासना व खोडवा पीक व्यवस्थापन या विषयावर कोंडवे येथे साखर कारखान्यामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिवेद्रसिंहराजे म्हणाले, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी तुटणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा तसेच पाचट आच्छादन करावे. खोडव्याचे ऊसविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार करावे. पुढील वर्षीच्या लागणीकरिता पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी ५ ते १० गुंठ्याचे बियाणे तयार करावेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सोसायटीच्या माध्यमातून साखर कारखान्याचे साह्णाने ठिबक सिंचन करावे असे आवाहनही त्यांनी केली. यावेळी फिनोलेक्स कंपनीचे डे. मॅनेजर व अ‍ॅग्रानॉमिस्ट विठ्ठल गोरे यांनी ऊसपीक लागवड व उसासाठी ठिबक सिंचन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कारखान्याच्या ऊसविकास विभागातर्फे ऊस खोडवा व्यवस्थापन, कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन, पाण्याची सोय नसताना दुष्काळातील खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करून करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. (प्रतिनिधी)