शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

शिक्के उठविण्यासाठी सात गावांतील शेतकरी एकत्र

By admin | Updated: August 9, 2016 23:53 IST

खंडाळ्यात उपोषण सुरू : प्रश्न मार्गी लावण्याचे रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील यांचे आश्वासन

खंडाळा : औद्योगिकीकरणासाठी अधिग्रहीत जमिनीवरील शिक्के उठविण्यासाठी खंडाळ्यातील सात गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. शिक्के उठविण्यासाठी ठोस भूमिका शासनपातळीवर घेतली जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.खंडाळ्यातील बावडा, खंडाळा, मोर्वे, अहिरे, शिवाजीनगर, म्हावशी, भादे या गावांतील १६८० हेक्टर क्षेत्रांवरील औद्योगिकीकरणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील शिक्के काढून शेतकऱ्यांना त्या कसण्यासाठी रिकाम्या कराव्यात. ही शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सातही गावांतील शेतकऱ्यांनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून खंडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मूक मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास प्रारंभ केला. सात गावांतील तीस शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.या उपोषणाची दखल घेऊन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या समवेत शेतकऱ्यांची चर्चा केली. जमिनीवरील शिक्के काढण्यासंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्याशी मुंबई येथे एक बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, जोपर्यंत राज्यकर्ते दखल घेत नाहीत. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. (प्रतिनिधी)