शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्के उठविण्यासाठी सात गावांतील शेतकरी एकत्र

By admin | Updated: August 9, 2016 23:53 IST

खंडाळ्यात उपोषण सुरू : प्रश्न मार्गी लावण्याचे रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील यांचे आश्वासन

खंडाळा : औद्योगिकीकरणासाठी अधिग्रहीत जमिनीवरील शिक्के उठविण्यासाठी खंडाळ्यातील सात गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. शिक्के उठविण्यासाठी ठोस भूमिका शासनपातळीवर घेतली जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.खंडाळ्यातील बावडा, खंडाळा, मोर्वे, अहिरे, शिवाजीनगर, म्हावशी, भादे या गावांतील १६८० हेक्टर क्षेत्रांवरील औद्योगिकीकरणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील शिक्के काढून शेतकऱ्यांना त्या कसण्यासाठी रिकाम्या कराव्यात. ही शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सातही गावांतील शेतकऱ्यांनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून खंडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मूक मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास प्रारंभ केला. सात गावांतील तीस शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.या उपोषणाची दखल घेऊन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या समवेत शेतकऱ्यांची चर्चा केली. जमिनीवरील शिक्के काढण्यासंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्याशी मुंबई येथे एक बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, जोपर्यंत राज्यकर्ते दखल घेत नाहीत. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. (प्रतिनिधी)