सैदापूर, ता. कऱ्हाड येथे विदर्भ अॅग्रो संस्थेने आयोजित केलेल्या हळद, आले, लसूण आदी पिकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ कृषी सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, कृषितज्ज्ञ प्रकाश लोखंडे, प्रवीण पवार, कृषिभूषण मनोहर साळुंखे, कृषितज्ज्ञ डॉ. बी. एस. खांडेकर, शशिकांत कलगी, जगन्नाथ भगत, अविनाश पवार, लक्ष्मण घोलप, पांडुरंग पाटील, हणमंत घोलप, शिवाजी साळुंखे, सचिन पाटील आदीं उपस्थित होते.
दौलतराव चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांनी आता व्यापारी बनले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी संस्था स्थापन करून मॉल, कॉपशॉप या ठिकाणी शेतमाल पोहोचवला पाहिजे त्याची सुरुवात झाली झाली आहे. हळद, आले, लसूण ही पिके कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारी आहेत.
यावेळी तज्ज्ञांनी हळद, आले, लसूण या पिकांविषयी माहिती दिली. कमी अवधीत जास्त नफा देणारी ही पिके असून, यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रकाश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण पवार यांनी आभार मानले.
फोटो : ०७केआरडी०५
कॅप्शन : सैदापूर येथील शेतकरी मेळाव्यात उपविभागीय अधिकारी दौलतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.