शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

शेतकरी संघटनेने टाकली नांगी

By admin | Updated: December 17, 2014 22:51 IST

शेतकरी संघटनेची शकले

संजय कदम - वाठार स्टेशन  ल्या वर्षी ऊसदरासाठी तोडफोड आंदोलने करत आक्रमक झालेली शेतकरी संघटना यंदा मात्र सत्तेच्या गाजराला भुलली अन् आंदोलन दिशाहीन झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी शासनाला धारेवर धरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शकले पडली अन् शेतकरी एकटा पडला.उसाच्या चालू गाळप हंगामात उसाचा पहिला हप्ता जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत जाहीर होणार याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष असते. चालू वर्षी जयसिंगपुरात ऊस परिषद झाली. मात्र, या ऊस परिषदेत ऊसदराबाबतची आक्रमकता कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे आजपर्यंत ऊसदराचा प्रश्न जशाचा तसा ठेवत या संघटनेने राजकीय स्वार्थापोटी नांगी टाकली. केंद्राने एफआरपीमध्ये शंभर रुपयांची वाढ करत साडेनऊ साखर उताऱ्यासाठी २२०० रूपये एफआरपी जाहीर करत पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २३४ रूपये याप्रमाणे जिल्ह्याचा साखर उतारा लक्षात घेता २५०० ते २६०० एफआरपी किंमत होते. यातून तोडणी वाहतूक वजा जाता २००० ते २१०० हा दर निश्चित होईल. परंतु कारखान्यांसाठी २००० रूपये देणेही सद्य:स्थितीत शक्य नाही. त्यामुळे चालू वर्षी १७०० ते १८०० एवढाच उसाचा पहिला हप्ता देणार असल्याची भूमिका कारखानदार व्यक्त करतात.ऊसशेती ही दिवसेंदिवस न परवडणारी बाब झाली आहे. ऊसबियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी या सर्वांचा विचार करता ज्या प्रमाणात शेतकरी उसासाठी खर्च करतो, त्या तुलनेत ऊसदर मिळत नसल्याने भविष्यात ऊसदराला कंटाळून ऊस उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी किमान २४०० ते २५०० रुपये प्रतिटन दर मिळाला तर नव्या वर्षात उसाचे पीक उभे दिसेल, अन्यथा पुढील वर्षात ऊस टंचाईचा सामना जिल्हयातील कारखानदारांना करावा लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. याप्रश्नी सरकाने शेतकऱ्यांसाठी विशेष थेट अनुदान जाहीर करून ते शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करावेत.एकूणच चालू वर्ष हे ऊस उत्पादकांसाठी कडूच ठरणार, अशी स्थिती आहे.ऊसदराबाबत भविष्यात आंदोलने घडू नयेत, याबाबत मार्ग काढण्यासाठी नव्या सरकारने कारखान्यातील सर्व घटकांना समावेशक असे ऊसदर नियंत्रण समिती स्थापन केली. मात्र, या समितीतील सदस्यांमध्येच एकमत नसल्याने ऊसदर निश्चित करण्यात अपशयच आले.शेतकरी संघटनेची शकलेस्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमकता कमी झाल्याने या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी या संघटनेशी काडीमोड केला तर रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव गोडसे हे या संघटनेतून बाहेर पडले व राज्यातील शेतकऱ्यांच्या हितार्थ ’बळीराजा’ या नवीन शेतकरी संघटनेची स्थापना केली. आज बळीराजा हीच संघटना शेतकऱ्यांच्या ऊसदरासाठी आक्रमक झाली आहे. या संघटनेने दि. २१ डिसेंबरपासून जिल्ह्यातील कारखान्यांनी ३ हजार ५०० रूपये दर देण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.सहकाराचे वलय असलेल्या सातारा जिल्ह्यात सहकारी कारखान्यांच्या बरोबरीने खासगी साखर कारखानदारी उभी राहिली आहे. जिल्ह्यात एकूण १३ कारखान्यांपैकी ५ कारखाने खासगी आहेत. भविष्यात अजून २ सहकारी कारखाने खासगी होण्याची शक्यता आहे.