शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच

By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST

नितीन भरगुडे-पाटील : महावितरण कंपनीवर ताशेरे

खंडाळा : खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्या उद्योगधंद्यांना मदत करणारी एजन्सी वीज कंपनी आहे का? शेतकऱ्यांना वीज देण्याबाबत दुजाभाव का? असा सवाल करीत तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग सात दिवस दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, तसे न झाल्यास रास्ता रोको करावा लागेल, असा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व तालुका पंचायत समितीचे सदस्य नितीन भरगुडे-पाटील यांनी दिला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर कंपनीच्या हिताकरिता खांब रोवले तर विरोध करून फौजदारी गुन्हे दाखल करू, असे बैठकीत ठणकावून सांगण्यात आले. तालुका पंचायत समितीच्या दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील सभागृहात पंचायत समितीचे पदाधिकारी व वीज कंपनीचे अधिकारी यांची बैठक सभापती रमेश धायगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, दीपाली साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, गटविकास अधिकारी विलास साबळे आदी उपस्थित होते. वीज कंपनीचा भोंगळ कारभार आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावर बैठकीत चर्चा झाली. भरगुडे-पाटील म्हणाले, ‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी औद्योगिकीकरणासाठी जमिनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी राहिल्या, त्यांना पुरेशी वीज मिळावी,अशी अपेक्षा आहे. तालुक्यात वीज उपलब्धतेबाबत समतोल ठेवावा आणि सोमवार ते रविवार अशी सलग सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज द्या; अन्यथा सभापती धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करावे लागेल, असा इशारा दिला.पाणीपुरवठा योजनांना चोवीस तास वीज मिळावी, अशी मागणी करीत बेंगरुटवाडी, हरळी येथे वीज कंपनीचे कर्मचारी विजेचा दोष काढण्यासाठी सहकार्य करीत नसल्याबाबत अनिरुद्ध गाढवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर सलग आठ तास वीज द्या, अशी मागणी केली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एम. कुलकर्णी म्हणाले, ‘२००३ मध्ये केंद्र शासनाने कायदा केला आहे. महावितरणसह अन्य कंपन्यांवर ऊर्जा आयोगाचे नियंत्रण असल्याने वीज भारनियमनामध्ये बदल करण्याचा अधिकार शासनाला नाही. विजेची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत आहे. त्यानुसार चार दिवस दिवसा व तीन रात्री वीज पुरवठ्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)