शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दूधदर घटल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: November 17, 2014 23:25 IST

वाढती महागाई, शेती उत्पादनातील अस्थिर भाव, वाढता उत्पादन खर्च, वाढती मजुरी, जनावरांचे वाढते भाव, खतांची दिवसेंदिवस होणारी भाववाढ आदी कारणामुळे

कोपर्डे हवेली : शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात़ मात्र, सध्या हे शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत. गत काही दिवसांपासून दूध दरात कपात झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. दूध दरात चार-पाच रुपयांचा फरक पडत असल्याने हा व्यवसाय करणारे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. वाढती महागाई, शेती उत्पादनातील अस्थिर भाव, वाढता उत्पादन खर्च, वाढती मजुरी, जनावरांचे वाढते भाव, खतांची दिवसेंदिवस होणारी भाववाढ आदी कारणामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहेत़ अशातच दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून तालुक्यातील अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करीत आहेत़ काहीचा प्रपंच दुधावरच अवलंबून आहे़ पशुखाद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना ६ नोव्हेंबरपासून दूध संघ व शासनाने लिटरमागे तीन-चार रुपयांची कपात केल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे़ गत महिन्यापर्यंत म्हशीच्या दुधाचा लिटरचा दर दहा फॅटला ४९ रुपये होता़ हाच दर ६ नोव्हेंबर पासून ४५ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे़ गाईच्या दुधाचा चार फॅटचा दर २३ रुपये ४० पैसे होता़ सध्या तोच दर २१ रुपये ४० पैसे करण्यात आला आहे़ तीन-चार रुपये दूध दरात कपात झाल्याने हा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे़ त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी गोत्यात आल्याचे दिसत आहे़ ऊसदराचे घोंगडे भिजत पडले आहे़ अशातच दूध दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या शेतकरी संघटनेत वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आहेत. ऊसदराबाबतही अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे दूध दर वाढीसाठी कोण आवाज उठवणार? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे उभा ठाकला आहे़ दूध दर वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त होऊ शकतो़ (वार्ताहर)पशुखाद्याचे दरही अस्थिरपशुखाद्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. दूध उत्पादकांना हा खर्च भागवितानाच नाकीनऊ येत आहेत. सरकी पेंड ५० किलोचा दर गत महिन्यात १ हजार १०० रुपये होता. त्यानंतर हा दर ५० रुपयांनी कमी होऊन सध्या तो १ हजार ५० रुपये झाला. सध्या या दरामध्ये २५ रुपये वाढ होऊन सरकी पेंड ५० किलोचा आजचा दर १ हजार ७५ रुपये झाला आहे.दूध दरामध्ये कपात झाल्याने दूध व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे़ दुधाची दरवाढ होण्यासाठी दूध संघ आणि शासन यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- लक्ष्मण चव्हाण, दूध डेअरी चालक, कोपर्डे हवेलीखाद्याचे दर, वैरण, खताचे दर आणि दूध दर या गोष्टींचा विचार केला असता, अगोदरच दूध व्यवसाय गोत्यात आहे़ त्यामध्येच दूध दरात कपात झाल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे़ दूध दर वाढीसाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे़ - जगन्नाथ चव्हाण, दूध उत्पादक