शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की कंपन्यांपुढे शेतकरी हतबल!

By admin | Updated: October 20, 2015 23:51 IST

मोरणा परिसरातील चित्र : जमीनमालकावर खंडणी, मारहाणीचे गुन्हे : ’तारीख पे तारीख’ मुळे हैराण

पाटण : पोटच्या गोळ्याप्रमाणे जतन करून ठेवलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनी कवडीमोल किमतीला विकून पवनऊर्जा प्रकल्पासाठी ज्यांनी त्याग केला, त्याच मोरणा परिसरातील शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या खंडणी, मारहाणीच्या गुन्ह्यामुळे संबंधित शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हेलपाटे घालून बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असून, पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना आता शोधू कुठे, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.गेल्या तीन वर्षांपूर्वी मोरणा परिसरातील पठारांवर पवनचक्क्यांचे जाळे उभे होण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही पवनऊर्जा प्रकल्पाकामी घडामोडी सुरूच आहेत. जमिनींचे दलाल, गुंडांच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. यात खाकी वर्दीवाल्यांनी देखील ‘न भूतो न भविष्यती’अशा पद्धतीचा अतिरेक केला. यामुळे मोरणा भागातील बळीराजा चांगलाच भरडला गेला. नुसता भरडला नाही, तर खंडणीचे खोटे गुन्हे, मारहाण, नुकसान केले अशा गंभीर आरोपाखाली अनेक गावांतील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाला असल्याचे आरोप होत आहेत. गोकुळतर्फ पाटण, आंबेघरतर्फ मरळी, काहीर, कळकेवाडी, वाहे, दिक्षी आटोली, पाचगणी, कोकिसरे, गवळीनगर, पळशी, पाणेरी अशा सुमारे २५ गावांतील शेतकरी व महिला दररोज पाटणला हेलपाटे घालताना दिसत आहेत. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत असलेले शेतकऱ्यांचे चेहरे पाहून त्या पवनचक्की कंपन्यांच्या अन्यायाची चीड नागरिकांना आल्याशिवाय राहत नाही. नेहमी सत्याचा विजय होतोच; पण ती वेळ येईपर्यंत हेलपाटे घालून बेजार होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)म्हणे पवनचक्कीची केस मोरणा परिसरातील शेतकरी जर पाटणमध्ये दिसला आणि त्याला विचारले की, पाटणला काय काम आहे तर सर्रास सांगितले जाते की, पवनचक्कीची केस आहे. पवनचक्की संदर्भातील गुन्ह्यांची संख्या काढली तर ती जवळपास शेकडोच्या घरात जाईल.कंपन्यांचे प्रतिनिधी संपर्कहीन ज्या शेतकऱ्यांना बोगस चेक दिले, अशांच्या तक्रारी आहेत. तसेच जमिनींचे वाद आहेत. काहींना अजून जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठी पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींचा शोध घेताना शेतकरी बेजार झाला आहे. कुणी हैद्राबादला तर कुणी आंध्रप्रदेशात गेल्याचे सांगितले जाते. कंपन्यांनी पाटण, कऱ्हाड येथील कार्यालये बदलल्यामुळे प्रतिनिधींना कुठे शोधायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आमदारांनी हस्तक्षेप करावा..आमदार शंभूराज देसाई यांना शेतकऱ्यांवरील जुलूम व पवनचक्की प्रशासनाची अरेरावी चांगली ज्ञात आहे. त्याबाबत आमदारांना चीड आहे. मग आता पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आमदारांनीच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी होत आहे.