शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
5
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
6
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
7
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
8
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
9
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
10
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
11
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
13
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
14
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
15
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
16
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
17
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
18
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
19
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

जावळीत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

कुडाळ : जून महिन्यात माॅन्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी उरकून घेतली. शेतातील पीक चांगले आले असून, ...

कुडाळ : जून महिन्यात माॅन्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी उरकून घेतली. शेतातील पीक चांगले आले असून, आता पावसाची आवश्यकता आहे. मात्र, काही आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. माॅन्सूनच्या गायब होण्यामुळे शेतकऱ्यांना पिके करपण्याची भीती वाटू लाजली आहे.

जावळी तालुक्यातील खरिपाच्या पिकांची बहुतांश पेरणी पूर्ण झाली असून, पिकांची उगवणही चांगली झाली आहे. असे असताना गेली आठ दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. सध्या मे कडक ऊन पडत असून, पावसाअभावी पिके कोमेजून जात आहेत.

तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. माॅन्सूनचा पाऊस गायब झाल्याने भाताची लागणही लांबणीवर पडली आहे. भाताची रोपे लावणीयोग्य झाली असून, लागणीसाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. भाताची रोपे उन्हामुळे पिवळी पडू लागली आहेत. तालुक्यात पडलेला पाऊस हा पेरणीयोग्य झाला आहे. पिकांच्या वाढीसाठी आता पावसाची नितांत आवश्यकता आहे.

निसर्गाच्या या लहरीपणाचा कायमच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थितीने सर्वजण पुरते ग्रासले आहेत. यातच निसर्गानेही तोंड फिरवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम वाया जाईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

(चौकट)

पावसाअभावी पिके धोक्यात

या वर्षी माॅन्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली. यातच मृग नक्षत्राचा पाऊस चांगला होईल, असे वातावरण तयार झाले होते. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊसही झाला. मात्र गेली आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतात सगळीकडे हिरवेगार पीक डोलत असून, आता पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन पडत असल्याने पिके कोमजयला सुरुवात झाली आहे. पाऊस न झाल्यास खरीप हंगामातील पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. भाताच्या लागणीसाठीही शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

०४कुडाळ

फोटो: जावळी तालुक्यात शेतशिवारातील पिके बहरली असून, पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता आहे.

040721\img_20210703_135813.jpg

बहरलेले शेतशिवर पावसाच्या प्रतीक्षेत आहे.