शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

बोरजाईवाडीतील शेतकरी म्हणे सामूहिक आत्महत्येस परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:46 IST

कोरेगाव : बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील विकास सोसायटीकडून शेतकरी कॅश क्रेडिट योजनेतून कर्ज घेतलेल्या ४० शेतकऱ्यांना चुकीच्या निकषांमुळे कर्जमाफीचा ...

कोरेगाव : बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील विकास सोसायटीकडून शेतकरी कॅश क्रेडिट योजनेतून कर्ज घेतलेल्या ४० शेतकऱ्यांना चुकीच्या निकषांमुळे कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही. थकीत कर्ज दिसत असल्याने कर्जवसुलीचा तगादा लावण्यात आला असून, सहकार विभाग तसेच प्रशासन याबाबत लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात कर्जदार शेतकरी डॉ. दीपक बनसोडे यांनी पत्रकारांना माहिती दिली, ते म्हणाले, २०१५-१६ साली तालुक्याला दुष्काळाचा फटका बसला होता. दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत बोरजाईवाडीचा समावेश होता. मात्र, महसूल विभागाच्या मंडलस्तरावरील बदलामुळे किन्हई महसूल मंडलातून कुमठे मंडलाला आमचे गाव जोडले गेले. त्यावेळी आवश्यक कागदपत्रांची संचिका वर्ग न झाल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विकास सोसायटीकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ देण्यात आलेला नाही. याबाबत सोसायटी, बँकस्तरावर अथवा सहकार विभागाकडे चौकशी केल्यावर राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या निकषांकडे बोट दाखविले जात आहे. वास्तविक शासनाच्या परिपत्रकामध्ये शेतकरी कॅश क्रेडिट कर्ज योजनेचा पात्र अथवा अपात्र निकषामध्ये उल्लेखच नाही. त्यामुळे केवळ बँक आणि सोसायटीच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे डॉ. बनसोडे यांनी नमूद केले.

याबाबत आम्ही शासनस्तरावर पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोसायटीच्या संचालक मंडळाने दि. १० डिसेंबर २०१९ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत या शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्याची मागणी करणारा ठराव केला असून, तो जिल्हा बँकेस सादर केला आहे. बँकेने देखील राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत.

(चौकट)

प्रशासकीय पातळीवर दिरंगाई

डॉ. बनसोडे यांच्यासह शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांच्याकडे दि. १५ फेब्रुवारी रोजी केली आहे. त्यावर तहसीलदारांनी दि. १७ फेब्रुवारी रोजी सहायक निबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांच्याकडे पत्र दिले असून, त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, दहा दिवस उलटून गेले तरी त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याकडे डॉ. बनसोडे यांनी लक्ष वेधले.

(चौकट)

कर्जमाफी योजना शासनाची : सुनील माने

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे काम बँक करते, शेवटी बँकेत पैसा हा ठेवीदारांचा आहे. त्यामुळे वेळोवेळी कर्ज फेडणाऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो. शेतकरी कर्जमाफी योजना ही राज्य शासनाची आहे. त्यामुळे बोरजाईवाडीतील शेतकऱ्यांचा विषय हा राज्य शासनाशी निगडित आहे. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.