शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

वळवाच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST

कऱ्हाड : गत आठवड्यापासून हजेरी लावणाऱ्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक गावांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेच्या ...

कऱ्हाड : गत आठवड्यापासून हजेरी लावणाऱ्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक गावांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याचा फटका बसला, तसेच गारपीटही झाली. एक तासाहून जास्त वेळ मोठ्या पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसात आंबा, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस पिकाला हा पाऊस पोषक असला तरी आंबा, कलिंगड, टोमॅटो यासह अन्य फळवर्गीय पिकांना हा पाऊस मारक ठरला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर

कऱ्हाड : चचेगाव, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसाही काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. परिसरातील काही श्वानांचाही त्याने फडशा पाडला असून, परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गत काही महिन्यांपासून सुपने, काले, नारायणवाडी, आटके, चचेगाव, वहागाव, तळबीड परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन महिन्यांपूर्वी वनवासमाची परिसरात दोन बछड्यांचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापूर्वी आगाशिव डोंगर परिसरातील धोंडेवाडी, जखीणवाडी, तसेच मलकापूर परिसरात बिबट्याने हल्ला करीत शेळ्या, तसेच मोकाट श्वान फस्त केले आहेत. सध्या चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शासकीय कार्यालयात कोरोनामुळे शुकशुकाट

कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय अत्यावश्यक सेवाही सकाळी अकरापर्यंत सुरू असल्याने शासकीय कार्यालये सध्या ओस पडली आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयांत कामानिमित्त नागरिकांची मोठी वर्दळ असते; पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने गर्दी करण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे नेहमी गर्दीने भरून जाणारी शासकीय कार्यालये सध्या मात्र ओस पडली आहेत. शिवाय पन्नास टक्के उपस्थितीची अट असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही कार्यालयात कमी आहे.

ढेबेवाडीत झाडावर कोसळली वीज

सणबूर : ढेबेवाडी, ता. पाटण येथील वर्दळीच्या रस्त्यावर भर लोकवस्तीत असलेल्या नारळाच्या झाडावर रविवारी दुपारी वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. रविवारी दुपारपासून परिसरात वळवाच्या पावसाचे वातावरण होते. साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वर्दळीच्या ढेबेवाडी-सणबूर रस्त्यानजीकच असलेल्या भाग्यश्री मंगल कार्यालयासमोरील बाळासाहेब रैनाक यांच्या घरासमोर नारळाच्या झाडावर दुपारी चारच्या सुमारास वीज कोसळली. त्यामुळे क्षणात झाडाने पेट घेतला. भरवस्तीत ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण होते.