शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

श्रमदानातून साकारले शेततळे व स्मशानभूमी

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

कासाणी ग्रामस्थांची एकी : शासकीय अनुदानाशिवाय केले काम पूर्ण

बामणोली : ‘गाव करील ते राव करील काय?’ या ग्रामीण म्हमीप्रमाणे कासाणी, ता. सातारा या कास पठारालगतच्या दुर्गम गावकऱ्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखविली.ग्रामस्थांनी कोणत्याही अनुदानाशिवाय शेततळे आणि स्मशानभूमी रस्ता श्रमदानातून बांधला. २०१३ मध्ये पावसाळ्यात याच गावातील शेकडो जनावरे अतिवृष्टीने दगावली होती. तसेच एका शेतकऱ्याचा थंडीने गारठून मृत्यूही झाला होता. घाटाईदेवी मंदिरालगत असणाऱ्या या गावात मुरघ रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटरचा उताराचा कच्चा रस्ता आहे. पावसाळा सुरू झाला की, हा रस्ता पाऊस व चिखलामुळे बंद होतो. त्यामुळे गावकऱ्यांनी गावापासून दोन किलोमीटर डोंगरातून डांबरी रस्त्यापर्यंत पायपीट चालू होते. सध्या या रस्त्याचे खडीकरणाचे व डांबरीकरणाचे काम चालू आहे. गावाबाहेर ‘वेताळचा माळ’ परिसरात एक पाणवठा आहे. या पाणवठ्यातील पाणी वाहते असल्यामुळे ते न अडविल्यामुळे वाया जाते. या पाण्याचा सदुपयोग करता येईल का? या उद्देशाने ग्रामस्थांनी एकसंधतेने निर्णय घेऊन ग्रामविकास मंडळाकडे गावच्या काही शिल्लक रक्कमेतून व कास पठारावरील वनकमिटीकडे जमा शुल्कातील काही रक्कम काढून श्रमदान व मजुरी करून या पाणवठ्याच्या जागी शेततळे बांधले. गावातून या शेततळ्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे ७०० मीटर लांबीचा रस्ताही तयार केला.या शेततळ्यात आज सुमारे ३ लाख लिटरहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असताना कासाणी गावकऱ्यांनी श्रमदानातून कोणतेही शासकीय अनुदान न घेता हे बांधले आहे. बांधलेल्या शेततळ्याची पाहणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे करून ग्रामस्थांचे कौतुक केले व इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार काढले. ग्रामस्थांनी एकी ठेवली तर डोंगराएवढे काम ते सहज करू शकतात, याची प्रचिती यामुळे आली. (वार्ताहर)आम्ही सर्व कासाणी ग्रामस्थ महिला, युवकांनी एकमुखाने निर्णय घेऊन गावालगतच असणाऱ्या पाणवठ्यावर शेततळे बांधण्याचे ठरविले. सर्व ग्रामस्थ महिला यांनी सुमारे १५-२० दिवस श्रमदान करून या शेततळ्याचे काम पूर्ण केले. यासाठी ग्रामविकास मंडळ, कासाणी व संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी, कासाणी यांच्याकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली. यासाठी कोणत्याही शासकीय योजनेचा निधी घेतलेला नाही. - लक्ष्मण बादापुरेअध्यक्ष, वनव्यवस्थापन कमीटी, कासाणीसर्व कासाणी ग्रामस्थांनी श्रमदानाने स्मशानभूमी रस्ता व शेततळ्याचे काम आम्ही एकसंधतेने पूर्ण केले. शेततळ्यातील पाण्यामुळे आम्हाला शेती तसेच गुरेढोरे जंगली पशु-पक्ष्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. तसेच स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची ही सोय झाली आहे. आम्ही सर्व कासाणी ग्रामस्थांनी श्रमदान केल्यामुळेच हे सहजशक्य झाले आहे. विजय बादापुरे,ग्रामस्थ, कासाणी, ता. सातारा.