शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

टेंभूच्या निधीसाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: August 12, 2014 23:16 IST

देविखिंडीत आज आंदोलन : सांगोल्याकडे जाणारे पाणी अडविणार

विटा : दुष्काळी खानापूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील सर्वाधिक जमीन संपादित झाली असतानाही शासनाने टेंभूच्या टप्पा क्र. ४ व ५ साठी निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील टप्पा क्र. ४ व ५ च्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाने सांगोला तालुक्यापर्यंतची टेंभूची कामे पूर्ण करण्यासाठी मंजूर केलेल्या ९९ कोटी ४० लाख रुपये निधीतील २५ टक्के रक्कम टप्पा क्र. ४ व ५ साठी देऊन टेंभूचे पाणी तामखडी घाटमाथ्यावर सोडावे, या मागणीसाठी बुधवारी दुपारी संतप्त शेतकरी देविखिंडी (ता. खानापूर) येथील टेंभूच्या बोगद्याजवळ टेंभूचे पाणी अडवून आंदोलन करणार असल्याने पाटबंधारे विभागासह प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे.टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील एक ते दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. ही योजना मूळची खानापूर तालुक्यासाठी असताना टप्प्या-टप्प्याने कामे न करता राजकीय मंडळींनी मतासाठी सांगोल्यापर्यंतची कामे एकदम हाती घेतली. त्यामुळे सर्वच ठिकाणी टेंभूची कामे अपूर्ण राहिली. खानापूर पूर्व भागाला पाणी देण्यासाठी शासनाने टप्पा क्र. ४ व ५ चा आराखडा तयार केला; परंतु या कामाला निधीच मिळाला नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे टप्पा क्र. ४ व ५ साठी मंजूर निधीतून २५ टक्के निधी द्यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, हजारो शेतकरी एकत्रित आले आहेत. हे सर्व शेतकरी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता देविखिंडी येथे बोगद्याजवळ पाणी अडवून तीव्र आंदोलन करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (वार्ताहर)आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता विटा तहसील कार्यालयात तहसीलदार सौ. अंजली मरोड, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कनिष्ठ अभियंता खोत, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, सुभाष गायकवाड, अरुण माने, ब्रम्हदेव बागल, सुरेश जाधव, रामभाऊ देशमुखे यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे मोहिते यांना चांगलेच धारेवर धरले. टप्पा क्र. ४ व ५ साठी कधी निधी देणार व कामे कधी सुरू करणार, याचा प्रथम खुलासा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी बैठकीत केली; मात्र या दोन्ही टप्प्यांच्या कामासाठी आज बुधवारी आंदोलन करणारच असल्याचा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांचे मन वळविण्यात प्रशासनाला अपयश आले.