शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या निधीसाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: August 12, 2014 23:16 IST

देविखिंडीत आज आंदोलन : सांगोल्याकडे जाणारे पाणी अडविणार

विटा : दुष्काळी खानापूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील सर्वाधिक जमीन संपादित झाली असतानाही शासनाने टेंभूच्या टप्पा क्र. ४ व ५ साठी निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील टप्पा क्र. ४ व ५ च्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाने सांगोला तालुक्यापर्यंतची टेंभूची कामे पूर्ण करण्यासाठी मंजूर केलेल्या ९९ कोटी ४० लाख रुपये निधीतील २५ टक्के रक्कम टप्पा क्र. ४ व ५ साठी देऊन टेंभूचे पाणी तामखडी घाटमाथ्यावर सोडावे, या मागणीसाठी बुधवारी दुपारी संतप्त शेतकरी देविखिंडी (ता. खानापूर) येथील टेंभूच्या बोगद्याजवळ टेंभूचे पाणी अडवून आंदोलन करणार असल्याने पाटबंधारे विभागासह प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे.टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील एक ते दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. ही योजना मूळची खानापूर तालुक्यासाठी असताना टप्प्या-टप्प्याने कामे न करता राजकीय मंडळींनी मतासाठी सांगोल्यापर्यंतची कामे एकदम हाती घेतली. त्यामुळे सर्वच ठिकाणी टेंभूची कामे अपूर्ण राहिली. खानापूर पूर्व भागाला पाणी देण्यासाठी शासनाने टप्पा क्र. ४ व ५ चा आराखडा तयार केला; परंतु या कामाला निधीच मिळाला नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे टप्पा क्र. ४ व ५ साठी मंजूर निधीतून २५ टक्के निधी द्यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, हजारो शेतकरी एकत्रित आले आहेत. हे सर्व शेतकरी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता देविखिंडी येथे बोगद्याजवळ पाणी अडवून तीव्र आंदोलन करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (वार्ताहर)आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता विटा तहसील कार्यालयात तहसीलदार सौ. अंजली मरोड, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कनिष्ठ अभियंता खोत, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, सुभाष गायकवाड, अरुण माने, ब्रम्हदेव बागल, सुरेश जाधव, रामभाऊ देशमुखे यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे मोहिते यांना चांगलेच धारेवर धरले. टप्पा क्र. ४ व ५ साठी कधी निधी देणार व कामे कधी सुरू करणार, याचा प्रथम खुलासा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी बैठकीत केली; मात्र या दोन्ही टप्प्यांच्या कामासाठी आज बुधवारी आंदोलन करणारच असल्याचा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांचे मन वळविण्यात प्रशासनाला अपयश आले.