शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

शेतकरी खंडाळ्याचा; कर्जमाफी नाशिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:07 IST

मुराद पटेल।लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती ...

मुराद पटेल।लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी जाहीर केल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यापासून अनेक प्रकारची बंधने घातलेले परिपत्रक जाहीर केल्यानंतर शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामध्येच शासनाने योजनेचे खरे लाभार्थी मिळावेत, यासाठी शेतकºयांची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून आॅनलाईन भरण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण भागात ज्याठिकाणी इंटरनेटच्या सुविधा आहे. त्याठिकाणी शेतकºयांनी धाव घेत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागले. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या योजनेला सोसायटीसह बँकांनी हरताळ फासत आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून हात झटकल्याने तसेच शासनाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था गावांमधून अर्ज भरण्यासाठी निर्माण न केल्याने शेतकºयांवर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यामध्येच गेल्या दोन दिवसांपासून खंडाळा तालुक्यातील इंटरनेट सेवेसह शासनाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरणाºया महा ई सेवा केंद्र, सेतू, सायबर कॅफे यामध्ये शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बसावे लागत आहे. संबंधित कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरताना कर्जमाफी संदर्भातील माहिती भरल्यानंतर प्रिंट मारताना खंडाळा तालुक्यातील बबन सीताराम ढमाळ या शेतकºयाची माहिती ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चापडगाव या गावातील दत्तू चौधरी या शेतकºयाच्या नावावर निघाली. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.‘पीकविमा‘च्या वेबसाईटचाही गोंधळ...शासनाने पीकविमा भरण्यासाठी अनेक निकष लावत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबिवली. मात्र, हे करीत असताना शासनाच्या पीकविम्याच्या वेबसाईटचे तीन तेरा वाजत आहेत. वेबसाईट सतत डाऊन राहिल्याने व शासनाने दिलेली मुदतही संपल्याने खंडाळा तालुक्यातील अनेक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.कर्जमाफी संदर्भातील अनेक प्रकरणे खंडाळा तालुक्यातील अर्ज भरणाºया केंद्रावर निर्माण झाल्याने संबंधितांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्याची मोहीम स्थगित केली आहे. यामुळे तालुक्यातील कानाकोपºयातून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसत रिकाम्या हाताने परत घराकडे परतावे लागले. कर्जमाफी योजनेच्या संदर्भात शेतकºयांवर नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.