शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

शेतकरी देशोधडीला.. हीच समाजसेवा !

By admin | Updated: December 23, 2016 23:08 IST

शिवेंद्रसिंहराजे : उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार पलटवार; टोलनाक्यावरील लुटीबाबत मौन का ?

सातारा : ‘आता तुम्हाला समाजसेवक झाल्याचा साक्षात्कार झाला. तुम्ही समाजसेवक आहात हे ठीक आहे. पण, नेमकी काय समाजसेवा केली हे एकदा सातारकरांना कळू द्या,’ असे आव्हान देत ‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’ अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पलटवार केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘एखाद्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळले तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मी कार्यक्रमाला येऊ अथवा न येऊ, मी महाराज आहे. माझे नाव पत्रिकेत पाहिजेच, असे अनेक दबावतंत्राचे किस्से साताऱ्याने बघितलेत. राजमाता सुमित्राराजे यांनीच सातारकरांशी राजघराण्याचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत केले. मीच एकटा महाराज हे वधविण्यासाठी उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्रींनी थेट तेरावे वंशज हा शब्द हुडकून काढला.’‘खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकारण घराणे, महाराज आणि दहशत यावरच अवलंबून असते, हे सर्वश्रूत आहे. भ्रष्टाचाराचे तुणतुणे वाजवणाऱ्या उदयनराजेंना जिल्ह्यातील टोल नाक्यावर सामान्य जनतेची सुरू असलेली लूट दिसत नाही. या लुटीबाबत समाजसेवक उदयनराजे एक अवाक्षरही काढत नाहीत. आजवर खूप झाले. यापुढे मात्र दहशत आणि दबावतंत्राचे राजकरण करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटाच्या पोट निवडणुकीत कोणी दबावतंत्राचा वापर केला? उमदेवारी भरण्यासाठी आलेल्या बाळासाहेब लोहार यांना मारहाण करून त्यांचे अपहरण कोणत्या समाजसेवकाने केले? लोकशाही मार्गाने आणि मोकळ्या वातावरणात का निवडणूक होऊ दिली नाही, याचे उत्तर खासदारांकडे आहे का? नगर विकास आघाडीला पालिकेच्या कारभारात सामावून घेण्यापेक्षा सातारा विकास आघाडीला स्वच्छ, पारदर्शक आणि दबावविरहित कारभार करण्याची मुभा आणि समज द्या, असेही पत्रकात म्हटले आहे. सातारा शहर आणि सातारकरांच्या विकासासाठी होणाऱ्या सकारात्मक कारभाराला नगर विकास आघाडीचा नेहमीच पाठिंबा राहील. सातारकरांच्या हिताला बाधा पोहोचत असेल तर नगर विकास आघाडीचे बारा नगरसेवक कडाडून विरोध करतील, हेही खासदारांनी लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला. (प्रतिनिधी)...तर जमिनीवरील शिक्के हटवणार का? ‘महसूलमंत्री असताना खासदारांनी जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्यांतील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्वत:चे आणि मातोश्रींचे नाव चढवले. कायद्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारले आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. हीच का तुमची समाजसेवा?, असा परखड सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. तुम्ही खरंच समाजसेवक असाल, तुम्हाला खरंच समाजसेवा करायची असेल तर शेतकऱ्यांच्या सातबारावरील शिक्के उठवून त्यांना मालक करा. तुमच्यासाठी यापेक्षा दुसरी मोठी समाजसेवा ठरणार नाही,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे. ४०-० चं झालं काय?‘रंजना रावत नगराध्यक्ष असताना तुमच्या आघाडीचे ३७ नगरसेवक होते. त्यावेळी आमच्या आघाडीचे केवळ दोनच नगरसेवक होते. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत तुमच्या आघाडीची ३७ वरून १८ अशी घसरगुंडी झाली. आमचे दोनवरून १९ नगरसेवक झाले. याचा विसर खासदारांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४०-० करणारच अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष निकाल काय लागला, हे सर्वांनाच माहीत आहे. या वल्गनेचे पुढे काय झाले?,’ असाही सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे.