शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी देशोधडीला.. हीच समाजसेवा !

By admin | Updated: December 23, 2016 23:08 IST

शिवेंद्रसिंहराजे : उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार पलटवार; टोलनाक्यावरील लुटीबाबत मौन का ?

सातारा : ‘आता तुम्हाला समाजसेवक झाल्याचा साक्षात्कार झाला. तुम्ही समाजसेवक आहात हे ठीक आहे. पण, नेमकी काय समाजसेवा केली हे एकदा सातारकरांना कळू द्या,’ असे आव्हान देत ‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’ अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पलटवार केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘एखाद्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळले तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मी कार्यक्रमाला येऊ अथवा न येऊ, मी महाराज आहे. माझे नाव पत्रिकेत पाहिजेच, असे अनेक दबावतंत्राचे किस्से साताऱ्याने बघितलेत. राजमाता सुमित्राराजे यांनीच सातारकरांशी राजघराण्याचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत केले. मीच एकटा महाराज हे वधविण्यासाठी उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्रींनी थेट तेरावे वंशज हा शब्द हुडकून काढला.’‘खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकारण घराणे, महाराज आणि दहशत यावरच अवलंबून असते, हे सर्वश्रूत आहे. भ्रष्टाचाराचे तुणतुणे वाजवणाऱ्या उदयनराजेंना जिल्ह्यातील टोल नाक्यावर सामान्य जनतेची सुरू असलेली लूट दिसत नाही. या लुटीबाबत समाजसेवक उदयनराजे एक अवाक्षरही काढत नाहीत. आजवर खूप झाले. यापुढे मात्र दहशत आणि दबावतंत्राचे राजकरण करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटाच्या पोट निवडणुकीत कोणी दबावतंत्राचा वापर केला? उमदेवारी भरण्यासाठी आलेल्या बाळासाहेब लोहार यांना मारहाण करून त्यांचे अपहरण कोणत्या समाजसेवकाने केले? लोकशाही मार्गाने आणि मोकळ्या वातावरणात का निवडणूक होऊ दिली नाही, याचे उत्तर खासदारांकडे आहे का? नगर विकास आघाडीला पालिकेच्या कारभारात सामावून घेण्यापेक्षा सातारा विकास आघाडीला स्वच्छ, पारदर्शक आणि दबावविरहित कारभार करण्याची मुभा आणि समज द्या, असेही पत्रकात म्हटले आहे. सातारा शहर आणि सातारकरांच्या विकासासाठी होणाऱ्या सकारात्मक कारभाराला नगर विकास आघाडीचा नेहमीच पाठिंबा राहील. सातारकरांच्या हिताला बाधा पोहोचत असेल तर नगर विकास आघाडीचे बारा नगरसेवक कडाडून विरोध करतील, हेही खासदारांनी लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला. (प्रतिनिधी)...तर जमिनीवरील शिक्के हटवणार का? ‘महसूलमंत्री असताना खासदारांनी जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्यांतील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्वत:चे आणि मातोश्रींचे नाव चढवले. कायद्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारले आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. हीच का तुमची समाजसेवा?, असा परखड सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. तुम्ही खरंच समाजसेवक असाल, तुम्हाला खरंच समाजसेवा करायची असेल तर शेतकऱ्यांच्या सातबारावरील शिक्के उठवून त्यांना मालक करा. तुमच्यासाठी यापेक्षा दुसरी मोठी समाजसेवा ठरणार नाही,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे. ४०-० चं झालं काय?‘रंजना रावत नगराध्यक्ष असताना तुमच्या आघाडीचे ३७ नगरसेवक होते. त्यावेळी आमच्या आघाडीचे केवळ दोनच नगरसेवक होते. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत तुमच्या आघाडीची ३७ वरून १८ अशी घसरगुंडी झाली. आमचे दोनवरून १९ नगरसेवक झाले. याचा विसर खासदारांना पडला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ४०-० करणारच अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष निकाल काय लागला, हे सर्वांनाच माहीत आहे. या वल्गनेचे पुढे काय झाले?,’ असाही सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे.