शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

अवकाळीने कांदा अन् दराने शेतकरी कोलमडला..

By admin | Updated: March 3, 2015 22:45 IST

जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

सातारा : शहरासह जिल्ह्यात शनिवार, रविवार सलग दोन दिवस झालेल्या वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हाता-तोंडाशी आलेली अनेक पिके भुईसपाट झाल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. वळिवाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसला असून तोडलेला कांदा भिजल्याने कांद्याचा भाव दोनच दिवसात गडगडला आहे.जिल्ह्यात गहू, ज्वारी, ऊस या पिकांबरोबरच कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अनेक ठिकाणी कांदा काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कांद्याची तोडणी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा सुकण्यासाठी रानात ठेवला होता. अशा परिस्थितीत जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तोडून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजल्याने कांदा उत्पादक याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.कांदा ओला झाल्याने दोनच दिवसात कांद्याचे दर कोलमोडले असून बाजारपेठेत सध्या लहान आकाराचा व कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी हाच कांदा २० ते २५ रुपये या दराने विकला जात होता. होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्या शेतकरी मिळेल या दराला कांद्याची विक्री करीत आहेत. सातारा शहरात शेतकरी फिरत्या वाहनामधून कांद्यांची विक्री करताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)बाजारपेठेत वाळलेल्या कांद्याला मोठी मागणी असते. या कांद्याला भावही चांगला मिळतो. अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास भविष्यात कांद्याचे दर वाढणार असल्याची भीती ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.नकांद्याला चांगला दर मिळेल म्हणन आशावादी असतानाच अवकाळी पावसाने घात केला. कांदा भिजल्यामुळे कोंब फुटण्याची शक्यता असून, आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करावे अन्यथा शेतकरी कोलमंडुन जाईल.- भानुदास कापसे,शेतकरी, राजापूर