शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ‘जिवंत माणसं’ कोरोनापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST

सातारा : एक काळ असा होता, जेव्हा कोरोनाबाधित व्यक्तीच्या अगदी पन्नास फूट अंतरावर उभं राहणंही अनेकांना जोखमीचंं वाटत होतं. ...

सातारा : एक काळ असा होता, जेव्हा कोरोनाबाधित व्यक्तीच्या अगदी पन्नास फूट अंतरावर उभं राहणंही अनेकांना जोखमीचंं वाटत होतं. मात्र, सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही जोखीम पत्करली अन् कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करून आपले दायित्वही पूर्ण केले. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतल्याने कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ही माणसं अन् त्यांचं कुटुंब मात्र कोरोनापासून आजही चार हात लांब आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पालिकेची आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षभरापासून जीवतोड मेहन घेत आहे. एकीकडे या प्रयत्नांना यश मिळत असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्धचा लढा अविरतपणे सुरूच आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्या पहिल्या रुग्णावर साताऱ्यातील संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून सर्वच मृतांवर संगममाहुलीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली. मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अत्यंत जोखमीचे होते. मात्र, आरोग्य कर्मचारी मृतांचे पालकत्व स्वीकारून आपले दायित्व पूर्ण केले व आजही करत आहेत.

पालिकेचे आठ कर्मचारी गेल्या वर्षभरापासून कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांनी २००० मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यानंतर प्रथम मृतदेह निर्जंतुक केला जातो. यानंतर तो सील म्हणजेच हवाबंंद करून अंत्यसंस्कारासाठी नेला जातो. मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आल्यानंतर पीपीई किट, फेस शिल्ड, हॅण्डग्लोज, मास्क आदी सुरक्षेची साधनं परिधान करून कर्मचारी मृतांवर अंत्यसंस्कार करतात. अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमी सोडियम हायपोक्लोराइडद्वारे निर्जंतुक केली जाते. कर्मचाऱ्यांकडून घरी जाण्यापूर्वी देखील सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाते. यामुळेच कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ही जिवंत माणसं आजही कोरोनापासून दूर आहेत, हे विशेष.

(पॉइंटर्स)

शहरातील स्मशानभूमी २

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांची संंख्या ८

आतापर्यंत कोरोनाबाधित १

(कोट)

कोरोनामुळे दगावणाऱ्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अत्यंत जोखमीचे होते. सुरुवातीला थोडी भीती वाटली; परंतु आरोग्य अधिकारी व प्रशासनाने आमच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडली नाही. सुरक्षेची सर्व साधनं वेळोवेळी मिळत गेली. त्यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने मृतांवर अंत्यसंस्कार करू शकलो.

- संदीप पाटसुते, आरोग्य मुकादम

(कोट)

मृतदेह ताब्यात घेतल्यापासून अंत्यसंस्कार करेपर्यंत आम्ही स्वत:च्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतो. प्रारंभी हे काम करताना भीती वाटली; मात्र त्यांनतर सवय होत गेली. अंत्यसंस्कार करून घरी परतल्यानंतरही आम्ही कपडे निर्जंतुक करतो. अंघोळ करतो. मगच घरात जातो. त्यामुळे आज आम्ही व कुटुंब कोरोनापासून दूर आहोत.

- लक्ष्मण कांबळे, कर्मचारी

(कोट)

पालिका प्रशासनाने आमच्या खांद्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवली. आम्ही आठ कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले काम जबाबदारीने व सुरक्षितरीत्या पूर्ण करीत आहोत. नागरिकांनी देखील स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सचे पालन करायला हवे.

- कपिल मट्टू, कर्मचारी

फोटो : १५ संदीप पाटसुते/ १५ लक्ष्मण कांबळे/ १५ कपिल मट्टू

फोटो : १५ संगममाहुली अंत्यसंस्कार

डमी : १४ सचिन डमी