शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आर्थिक संकटाशी झुंजत जपला कौटुंबिक एकोपा

By admin | Updated: March 30, 2016 00:03 IST

मुळीकवाडी : महादेव माहिते यांची पंचवीस जणांची चौथी पिढी नांदतेय गुण्यागोविंदानं एकत्र

सूर्यकांत निंबाळकर -- आदर्की --‘नको दुरावा मनामध्ये, नको घराला गर्व धनाचा, लीन राहावे प्रभूचरणी’ या काव्याप्रमाणे महादेव मोहिते यांच्या कुटुंबात २५ सदस्य आहेत. थोरांपासून लहानांपर्यंत सर्वांना एकमेंकाबद्दल आदर आहे. आई-वडिलांची हलाखीची परिस्थितीत असताना पाच भावंडे पाच पांडवाप्रमाणे जीवनाशी संघर्ष करीत राहिले. या संघर्षाचे स्मरण ठेवून आजही मोहिते यांची चौथी पिढी एकत्र नांदत आहे. इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी।। महोदव मोहिते यांच्या रूपाने लावलेल्या रोपाचा वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळाले. चार पिढ्या एकत्र ठेवण्याचे स्वप्न व प्रयत्न अंकुशराव मोहितेंनी लिलया पेलले आहे.थोरले बंधू अंकुशराव मोहिते शेती करतात. दुसरे बंधू दीपक कापड बाजार मुंबईत काम करत. भारतीय सैन्यदलात भरती झाले. तृतीय बंधू अशोक पुणे येथे नामवंत कंपनीत कामाला आहेत, तर चतुर्थ बंधू ह. भ. प. संजय यांचे निधन झाले. लहुराज मोहिते शेती करत आहे.आपुलीया हिता असे जो जागता। धन्य माता-पिता तयाचिया, साधू-संताचे सात्विक विचाराची ह. भ. प. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या पद्स्पर्श मोहिते यांच्या घराला झाल्यापासून सर्वजण वैष्णव झालो. घरामध्ये आई राणीबाई, वहिनी निर्मला, छाया, संगीता, शीतल, विजया, मनीषा, सुषमा, काजल सुना. जगदीश, अतुल, अश्विन, सुहास, अक्षय, रेश्मा, मोहिनी, साक्षी, मयूर, गौरी, संचती, स्वरा, राजवीर, पुतणे आणि नातू असा परिवार आहे. घरामध्ये हालाखीची परिस्थिती असतानासुद्धा मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वत:चा पायावर उभे करण्याचे नेहमी बजावत आलो. अतुल डॉक्टर, अश्विन सॉफ्टवेअर इंजिनिअर, सुहास मॅकॅनिकल इंजिनिअर, अक्षय मॅकॅनिकल इंजिनिअर आहेत.मोहिेते यांची १२ एकर शेती पूर्ण रानवड, माळरान होती. त्यामध्ये काही पिकत नव्हते; पण मनाला जिद्द आणि चिकाटी ठेवून शेती पूर्ण बागायत करत त्यामध्ये ऊस, कांदा, टोमॅटो, भेंडी, वांगी, भोपळा, मिरची असे नवनवीन पिके घेऊन विक्रमी उत्पादन काढले आहे. भूमातेच्या सेवेत सर्व कुटुंब सतत झटत आहे.आज या कुटुंबाचा आधारवड ८० वर्षांचा झाला आहे. जीवनात आर्थिक, सुख-दु:खावर मात करत सर्वजण गुण्यागोविंदाने विनातक्रार एका छताखाली राहत आहेत. मुळीकवाडी गावातील प्रत्येकाला मोहिते यांच्या या घराविषयी आपुलकी आहे.कुटुंबातील जिव्हाळा महत्त्वाचा!कुटुंबातील पे्रम, जिव्हाळा, आत्मीयता या सर्व गुणाचा परिबोध एकत्रित कुटुंबातच होतो. हम दो, हमारे दो, मै और मेरी बीबी ही संकुचित विचारच समाजाला दु:खाला कारणीभूत असावेत, म्हणून घरात सात्विक विचार असावेत. कधी ही काही कमी पडू देत नाहीत ही शिकवण मोहते यांच्या पिढीत चांगलीच भिनली आहे. त्यामुळे घरात येणाऱ्या आणि लग्न करून जाणाऱ्या मुलीही हेच शिकतात. घरात कोणताही सणसमारंभ सर्वांच्या एकत्रीत येण्याशिवाय पूर्ण होत नाही. आठवडाभर चालणारी दिवाळी आणि त्यासाठी महिनाभर व्यस्त महिला ही मोहिते कुटूंबाची शान आहे. घरातील प्रत्येकाला विचारात घेवून निर्णय घेण्याच्या पध्दतीमुळे परस्परांमधील विश्वास दृढ होत आहे. प्रत्येकावर हक्काने रागविण्याचा आणि प्रेम करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पसारा झाला म्हणून आई ओरडली तर मुलांच्ी बाजू घेवून त्यांना पदराखाली घेण्यासाठी आजी आणि काकु सक्रिय असतात.