शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

जिल्ह्यात शिक्षक परिषदेत धुसफूस! नेत्यांवर

By admin | Updated: March 20, 2016 23:49 IST

मनमानीचा आरोप : अनेकजण राजीनाम्याच्या पवित्र्यात; संघटनेला घरघर

कऱ्हाड : प्राथमिक शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक समजला जातो. जिल्ह्यात शिक्षकांची संख्याही मोठी आहे. तितक्याच त्यांच्या संघटनांची यादीही मोठी आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात शिक्षक परिषद नावाच्या संघटनेने यात भर टाकली; पण सध्या वैचारिक समन्वयाअभावी संघटनेत धुसफूस सुरू झाली असून, लवकरच संघटनेला खिंडार पडल्याचे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. शिक्षकांच्या संघटना, असा उल्लेख केला की शिक्षक नेते शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांची नावे पश्चिम महाराष्ट्रात घेतली जातात; पण यांच्याच तालमीत तयार झालेल्या अनेकांना आपणही एखाद्या संघटनेचे नेते व्हावे, असे वाटू लागते. त्यामुळेच त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात सन २०१५ मध्ये शिक्षक परिषद नावाची नवी संघटना जन्माला आली. गेल्या सहा महिन्यांत यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून काही तालुक्यांमध्ये संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पूर्ण जिल्ह्यात बांधणी होण्याआधीच परिषदेत धुसफूस सुरू झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. पाटण शिक्षक सोसायटीवर शिक्षक नेते संभाजीराव थोरात व जिल्हा चिटणीस महेंद्र जानुगडे यांच्या माध्यमातून राजेंद्र बोडके संचालक म्हणून निवडून गेले. संघटनेतील दुहीतून त्यांनी शिवाजीराव पाटील यांचे नेतृत्व माणणाऱ्या प्रदीप घाडगे यांना साथ दिली. मात्र, तेथेही त्यांचे मन न रमल्याने काही निवडक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बोडके यांनी शिक्षक परिषद नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना शिवाजी व संभाजी या गुरू-शिष्याच्या वादामुळे चांगली भरारी घेईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आज परिषदेतील अंतर्गत नाराजीमुळे संघटनेला खिंडार पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा शिक्षक परिषदेचे नेते भगवान भुताडमल व जिल्हा कोषाध्यक्ष संतोष डवरे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव मोरे, उपाध्यक्ष महादेव सांबरेकर, अशोक जाधव तसेच पाटण तालुका सरचिटणीस मुरलीधर चौरे, तालुका उपाध्यक्ष नागनाथ केंगार, सहसरचिटणीस रमेश बनकर, अनंत आघाव, संतोष बागडे आदी पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांचे राजीनामे तयार असून, लवकरच ते संबंधितांकडे सोपविले जाऊ शकतात. त्यामुळे हे कार्यकर्ते कोणत्या ‘स्वगृही’ परतणार याबाबत शिक्षण वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतील नेते संघटनेच्या कार्यकारिणीला विश्वासात न घेता अनेक निर्णय घेत आहेत. ज्या कारणावरू न ही शिक्षक परिषद जन्माला आली. त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम संघटनेत सुरू आहे. त्यामुळे माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. - भगवान भुताडमल,जिल्हा शिक्षक परिषदेचे नेते