शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

लबाड पालकमंत्र्यांचा निधी उल्लू बनवितोय!

By admin | Updated: October 24, 2015 00:56 IST

जयकुमार गोरे : विजय शिवतारेंवर हल्लाबोल; जिहे-कटापूर योजना पूर्ण करू म्हणणाऱ्यांकडून निधीची माहिती खोटी

सातारा : ‘जिल्ह्याचे पालकमंत्री लढवय्ये आहेत. त्यांनी पुरंदरला पाणी आणले. वर्षापूर्वी तर त्यांनी वर्षभरात माण-खटाव तालुक्यांला जिहे-कटापूर योजनेचे पाणी पोहोचविणार, अशी घोषणा केली होती. आता तर ते या योजनेसाठी निधी मंजूर केला म्हणून सांगत आहेत. सध्याचे पालकमंत्री हे प्रत्येक गोष्ट चुकीची व खोटी सांगत आहेत. हे पालकमंत्री म्हणजे लोकांना उल्लू बनविणारे आणि लबाड आहेत, असा पालकमंत्री जिल्ह्याला कधीच मिळाला नव्हता,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सध्या गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा बँकेतील माहिती घेत आहे. येथून पुढे बँकेतील प्रत्येक बैठकीनंतर याविषयी पत्रकारांशी बोलू, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेसाठी ६२ कोटंचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. त्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी आमदार गोरे यांनी सातारच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांच्यावर हल्लाबोल करतानाच चौफेर टीकाही केली. आमदार गोरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी वर्षभरापूर्वी जिहे-कटापूर योजना पूर्ण करू, असे सांगितले होते. पण, अधिकाऱ्यांच्या मतानुसार या योजनेला अत्यल्प निधी मिळाला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी मी १०४ कोटींच्या निधीची तरतूद करून आणली होती. तर गेल्या १६ वर्षांत या योजनेवर ८२ कोटी रुपये खर्च झाले, तर गेल्या साडेतीन वर्षांत २९८ कोटी रुपये खर्ची घातले. सध्या या योजनेसाठी पालकमंत्री निधी मंजूर झाला आहे, असे सांगत आहेत. ते पूर्णपणे खोटे आहे. कारण, महामंडळाकडे पैसे शिल्लक आहेत. त्यामधून निधी देण्यात आलेला आहे. खरेतर पालकमंत्री हे लोकांना उल्लू बनवत आहेत, असे लबाड पालकमंत्री मी प्रथमच पाहत आहे. यापूर्वीचे दोन पालकमंत्री असेच या योजनेसाठी आश्वासन देऊन गेले. एकाने तर या पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी देता येणार नाही, असे सांगितले होते. सध्याच्या पालकमंत्र्यांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी लबाडी करू नये. ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू,’ असा सल्लाही आमदार गोरे यांनी दिला. (प्रतिनिधी) जयकुमार गोरे म्हणाले....मुख्यमंत्र्यांना शेती, सिंचन योजनेचे काहीच कळत नाही पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊ नये, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात आठ दिवसांतून एकदा यावे राजकारण न करता पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजेत जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील घोषणा पूर्ण करावी मागचं सरकार शहाणं नव्हतं, तुम्ही शहाणे आहात तर काय करणार, ते सांगा. माणमधील सर्व नेते मोडीत...या पत्रकार परिषदेदरम्यान, माण तालुक्यातील राजकारणासंदर्भात त्यांनी भाष्य केले. माणमधील सर्व नेते मोडीत निघाले आहेत. त्यामुळे अनेकजण माझ्याकडे येत आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे. ‘रासप’ कुठे आहे, ते माहीत नाही. हळूहळू सर्व संपतील, असा आशावाद आमदार गोरे यांनी व्यक्त केला.