शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लबाड पालकमंत्र्यांचा निधी उल्लू बनवितोय!

By admin | Updated: October 24, 2015 00:56 IST

जयकुमार गोरे : विजय शिवतारेंवर हल्लाबोल; जिहे-कटापूर योजना पूर्ण करू म्हणणाऱ्यांकडून निधीची माहिती खोटी

सातारा : ‘जिल्ह्याचे पालकमंत्री लढवय्ये आहेत. त्यांनी पुरंदरला पाणी आणले. वर्षापूर्वी तर त्यांनी वर्षभरात माण-खटाव तालुक्यांला जिहे-कटापूर योजनेचे पाणी पोहोचविणार, अशी घोषणा केली होती. आता तर ते या योजनेसाठी निधी मंजूर केला म्हणून सांगत आहेत. सध्याचे पालकमंत्री हे प्रत्येक गोष्ट चुकीची व खोटी सांगत आहेत. हे पालकमंत्री म्हणजे लोकांना उल्लू बनविणारे आणि लबाड आहेत, असा पालकमंत्री जिल्ह्याला कधीच मिळाला नव्हता,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सध्या गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा बँकेतील माहिती घेत आहे. येथून पुढे बँकेतील प्रत्येक बैठकीनंतर याविषयी पत्रकारांशी बोलू, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेसाठी ६२ कोटंचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. त्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी आमदार गोरे यांनी सातारच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांच्यावर हल्लाबोल करतानाच चौफेर टीकाही केली. आमदार गोरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी वर्षभरापूर्वी जिहे-कटापूर योजना पूर्ण करू, असे सांगितले होते. पण, अधिकाऱ्यांच्या मतानुसार या योजनेला अत्यल्प निधी मिळाला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी मी १०४ कोटींच्या निधीची तरतूद करून आणली होती. तर गेल्या १६ वर्षांत या योजनेवर ८२ कोटी रुपये खर्च झाले, तर गेल्या साडेतीन वर्षांत २९८ कोटी रुपये खर्ची घातले. सध्या या योजनेसाठी पालकमंत्री निधी मंजूर झाला आहे, असे सांगत आहेत. ते पूर्णपणे खोटे आहे. कारण, महामंडळाकडे पैसे शिल्लक आहेत. त्यामधून निधी देण्यात आलेला आहे. खरेतर पालकमंत्री हे लोकांना उल्लू बनवत आहेत, असे लबाड पालकमंत्री मी प्रथमच पाहत आहे. यापूर्वीचे दोन पालकमंत्री असेच या योजनेसाठी आश्वासन देऊन गेले. एकाने तर या पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी देता येणार नाही, असे सांगितले होते. सध्याच्या पालकमंत्र्यांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी लबाडी करू नये. ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू,’ असा सल्लाही आमदार गोरे यांनी दिला. (प्रतिनिधी) जयकुमार गोरे म्हणाले....मुख्यमंत्र्यांना शेती, सिंचन योजनेचे काहीच कळत नाही पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊ नये, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात आठ दिवसांतून एकदा यावे राजकारण न करता पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजेत जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील घोषणा पूर्ण करावी मागचं सरकार शहाणं नव्हतं, तुम्ही शहाणे आहात तर काय करणार, ते सांगा. माणमधील सर्व नेते मोडीत...या पत्रकार परिषदेदरम्यान, माण तालुक्यातील राजकारणासंदर्भात त्यांनी भाष्य केले. माणमधील सर्व नेते मोडीत निघाले आहेत. त्यामुळे अनेकजण माझ्याकडे येत आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे. ‘रासप’ कुठे आहे, ते माहीत नाही. हळूहळू सर्व संपतील, असा आशावाद आमदार गोरे यांनी व्यक्त केला.