शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

लबाड पालकमंत्र्यांचा निधी उल्लू बनवितोय!

By admin | Updated: October 24, 2015 00:56 IST

जयकुमार गोरे : विजय शिवतारेंवर हल्लाबोल; जिहे-कटापूर योजना पूर्ण करू म्हणणाऱ्यांकडून निधीची माहिती खोटी

सातारा : ‘जिल्ह्याचे पालकमंत्री लढवय्ये आहेत. त्यांनी पुरंदरला पाणी आणले. वर्षापूर्वी तर त्यांनी वर्षभरात माण-खटाव तालुक्यांला जिहे-कटापूर योजनेचे पाणी पोहोचविणार, अशी घोषणा केली होती. आता तर ते या योजनेसाठी निधी मंजूर केला म्हणून सांगत आहेत. सध्याचे पालकमंत्री हे प्रत्येक गोष्ट चुकीची व खोटी सांगत आहेत. हे पालकमंत्री म्हणजे लोकांना उल्लू बनविणारे आणि लबाड आहेत, असा पालकमंत्री जिल्ह्याला कधीच मिळाला नव्हता,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सध्या गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा बँकेतील माहिती घेत आहे. येथून पुढे बँकेतील प्रत्येक बैठकीनंतर याविषयी पत्रकारांशी बोलू, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेसाठी ६२ कोटंचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. त्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी आमदार गोरे यांनी सातारच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांच्यावर हल्लाबोल करतानाच चौफेर टीकाही केली. आमदार गोरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी वर्षभरापूर्वी जिहे-कटापूर योजना पूर्ण करू, असे सांगितले होते. पण, अधिकाऱ्यांच्या मतानुसार या योजनेला अत्यल्प निधी मिळाला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी मी १०४ कोटींच्या निधीची तरतूद करून आणली होती. तर गेल्या १६ वर्षांत या योजनेवर ८२ कोटी रुपये खर्च झाले, तर गेल्या साडेतीन वर्षांत २९८ कोटी रुपये खर्ची घातले. सध्या या योजनेसाठी पालकमंत्री निधी मंजूर झाला आहे, असे सांगत आहेत. ते पूर्णपणे खोटे आहे. कारण, महामंडळाकडे पैसे शिल्लक आहेत. त्यामधून निधी देण्यात आलेला आहे. खरेतर पालकमंत्री हे लोकांना उल्लू बनवत आहेत, असे लबाड पालकमंत्री मी प्रथमच पाहत आहे. यापूर्वीचे दोन पालकमंत्री असेच या योजनेसाठी आश्वासन देऊन गेले. एकाने तर या पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी देता येणार नाही, असे सांगितले होते. सध्याच्या पालकमंत्र्यांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी लबाडी करू नये. ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू,’ असा सल्लाही आमदार गोरे यांनी दिला. (प्रतिनिधी) जयकुमार गोरे म्हणाले....मुख्यमंत्र्यांना शेती, सिंचन योजनेचे काहीच कळत नाही पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊ नये, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात आठ दिवसांतून एकदा यावे राजकारण न करता पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजेत जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील घोषणा पूर्ण करावी मागचं सरकार शहाणं नव्हतं, तुम्ही शहाणे आहात तर काय करणार, ते सांगा. माणमधील सर्व नेते मोडीत...या पत्रकार परिषदेदरम्यान, माण तालुक्यातील राजकारणासंदर्भात त्यांनी भाष्य केले. माणमधील सर्व नेते मोडीत निघाले आहेत. त्यामुळे अनेकजण माझ्याकडे येत आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे. ‘रासप’ कुठे आहे, ते माहीत नाही. हळूहळू सर्व संपतील, असा आशावाद आमदार गोरे यांनी व्यक्त केला.