शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

खोट्या तक्रारी देणाऱ्यांना शिक्षेसाठी वेगळा कायदा करा

By admin | Updated: October 18, 2016 22:34 IST

अशोक गायकवाड : अ‍ॅट्रॉसिटी हे मागसवर्गीयांचे कवचकुंडल

सातारा : ‘अ‍ॅट्रॉसिटी हा कायदा मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले हे कवच असून, हा कायदा रद्द झाल्यास मागासवर्गीयांवर अत्याचार वाढतील. याचा गैरवापर होतो हे मान्य असून, खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वेगळा कायदा निर्माण करावा,’ अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी दि. १४ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक लागल्याने आचारसंहिता जारी झाली आहे. आचारसंहितेत मोर्चा काढता येत नसल्याने मोर्चासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे रितसर अशी परवानगी मागण्यात आली आहे.गायकवाड म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या अथवा जाती-धर्माच्या विरोधात नसून बहुजनांच्या समस्यांसाठी आहे. यासाठी विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, तालुकास्तरीय कमिट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तर संयोजन समिती तयार करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख लोक यामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे.मोर्चाच्या तयारीासाठी ग्रामीण भागात जोरात तयारी सुरू आहे. हा मोर्चा पक्षविरहित असून, आपण व कार्यकर्ते एक बहुजन म्हणून मोर्चात सामील होणार आहे, असेही यावेळी अशोक गायकवाड म्हणाले. (प्रतिनिधी)