शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट; आलेल्या अर्जांचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख मदत मिळणार असल्याचा बनावट मेसेज फिरत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख मदत मिळणार असल्याचा बनावट मेसेज फिरत असून, या अर्जांचे करायचे काय? असे म्हणत प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोक्यावर हात मारुन घ्यावा लागतो आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची भरपाई मिळणार, असा बनावट मेसेज आणि सोबत बनावट अर्ज व्हायरल झाल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सातारा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने प्रशासनाकडे अर्ज आलेले आहेत. प्रशासनाकडे अशा अर्जांचा ढीग साठतो आहे. या अर्जांचे करायचे काय? हा प्रश्न सतावतो आहे.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) काय आहे बनावट मेसेज

कोरोना महामारीमुळे ज्या व्यक्तीने मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत शासनाच्यावतीने दिली जाणार आहे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती विभागात अर्ज दाखल करावा, असा बनावट मेसेज फिरतो आहे.

२) आपत्ती व्यवस्थापनाकडे आले दोन हजार अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही मदत मिळावी म्हणून तब्बल दोन हजार अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाच्यावतीने हे अर्ज वरिष्ठ पातळीवर जातील, अन् आर्थिक मदत मिळेल, अशी भाबडी आशा लोक धरुन बसले आहेत. या अर्जांबाबत प्रशासनाने संबंधितांना पत्र पाठवून अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

३) या अर्जांचे काय करणार?

जिल्हाधिकारी कार्यालयात रोज वेगवेगळी निवेदने सादर होत असतात. विशेषत: सामाजिक संघटनांच्यावतीने नित्याने आंदोलनाचा इशारा देणारी निवेदने येत असतात, आता त्यात याची भर पडली असल्याने या अर्जांचे करायचे काय? हा प्रश्न अधिकाऱ्यांना सतावत आहे.

४) अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही

शासनाने अशी कोणतीही योजना लागू केलेली नाही. जर कोणतीही योजना शासनाने जाहीर केली तर तसा लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असतो, या प्रकरणात मात्र तसे काहीच झाले नसून, अशा फसव्या मेसेजला फसून अर्ज करू नये.

देवीदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी