शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

निधी देऊनही विकासकामे करण्यात अपयश...

By admin | Updated: October 30, 2016 01:01 IST

पृथ्वीराज चव्हाण : जयवंत पाटील म्हणे... अपप्रवृत्तीला ठेचण्यासाठी एकत्र

कऱ्हाड : ‘मुख्यमंत्री पदाच्या काळात मी शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निधीच्या प्रमाणात त्या वेगाने विकासकामे करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले, अशी टीका करीत कऱ्हाडकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी प्रथमच पालिका निवडणुकीत लक्ष घालत असून, यशवंत जनशक्ती आघाडीचे नेतृत्व मी स्वत: करणार आहे,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. दरम्यान, जयवंत पाटील यांनी अपप्रवृत्तीला ठेचण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले.शनिवारी चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, सुभाष डुबल, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, शारदा जाधव, अरुण जाधव, दिलीप जाधव, नगरसेवक बाळासाहेब यादव, श्रीकांत मुळे, स्मिता हुलवान उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत कऱ्हाडकरांनी भरघोस पाठिंबा दिला. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कऱ्हाडकरांच्या विकासाबाबतीत अपेक्षा आहेत. त्यांनी स्वत:च निवडणुकीत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. म्हणूनच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रथमच पालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार आहे. त्या दृष्टिकोनातून यशवंत विकास आघाडी, जनशक्ती आघाडी, लोकसेवा आघाडी या सर्वांना एकत्रित करून निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. आघाडीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले असून, २ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणार आहोत.’जयवंत पाटील म्हणाले, ‘पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या अपप्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज होती. म्हणून गत वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टिकोनातून अनेकांशी चर्चा केली. आणि अखेर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’ राजेंद्र यादव म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कऱ्हाडसाठी भरघोस निधी दिला. कऱ्हाडच्या विकासाबाबत त्यांच्याकडे अनेक चांगल्या संकल्पना आहेत. म्हणून आम्ही यशवंत जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. ’ (प्रतिनिधी)आघाडीच्या माध्यमातून निवडणूक...काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा विचार होता. मात्र, नियोजनासाठी वेळ कमी मिळाल्याने समविचारी लोकांना एकत्र करून आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत.