शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

फडणवीसांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

सातारा : ‘सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पकड आहे हे मला मान्य नाही. आम्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरलो ...

सातारा : ‘सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पकड आहे हे मला मान्य नाही. आम्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरलो आहे,’ असा दावाच खा. गिरीश बापट यांनी केला. त्याचबरोबर ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे,’ असेही ठामपणे त्यांनी सांगितले.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर खा. गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ते दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. बापट म्हणाले, ‘महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हा विचार केंद्र शासनाने अमलात आणला आहे. खेडोपाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेड्यातील स्वयंरोजगाराला चालना देण्यात येत आहे. ‘मनरेगा’सारख्या योजना सुरू आहेत. हे सर्व कोणामुळे होत आहे हे लोकांनाही माहीत आहे. याचा बेस आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत याचा फायदा भाजपला नक्कीच होईल. तसेच भाजपचे संघटन वाढून पक्षाला बळही मिळेल.’

सातारा जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत. राजकारण कसे चालते याचीही माहिती आहे. भाजपच्या संघटनासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून खा. बापट पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी भाजपने कमी-अधिक फरकाने पॅनल उभे केले आहे. तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भाजपचे अडीच हजार कार्यकर्ते निवडून येतील.’

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व इतर काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर खा. गिरीश बापट म्हणाले, ‘अभ्यास करून एखाद्या नेत्याच्या बंदोबस्तात फरक होतो. याचा अर्थ दुर्लक्ष होत आहे, असा होत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबतही असे झाले. यामध्ये राजकीय आकस आहे, असे मला वाटत नाही. तरीही भाजपचे व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांची फौज संरक्षणासाठी सक्षम आहे.

चौकट :

सदिच्छा भेटीत उदयनराजेंशी गळा भेट...

खा. गिरीश बापट सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. साताऱ्यात आल्यावर प्रथम त्यांनी जलमंदिर येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेतली. तर खा. बापट यांनी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंवर स्तुतिसुमने उधळली. उदयनराजे आणि सर्व कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत. मी नेहमीच जलमंदिरात भेटायला येत असतो. ही सदिच्छा भेट आहे. सामान्य माणसांशी नाळ आणि त्यांच्यावरील प्रेम हे त्यांचे गुण आहेत. या गुणांमुळे उदयनराजे हे माझे एकदम जवळचे मित्र आहेत, असेही यावेळी स्पष्ट केले.