शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

तज्ज्ञ वैदूूंना येणार आता भरभराटीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:47 IST

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधुनिक काळाच्या ओघात स्मृतीत गेलेल्या ग्रामीण भागातील वैदूला आता शासनाच्या नवीन नियमामुळे भरभराटीचे दिवस येणार आहेत. गावच्या परिसरातील वनसंपदा ओळखून दिल्यास संबंधित वैदूला त्याचा चांगला मोबदला दिला जाणार आहे.ग्रामीण भागातील गायरानात सापडत असलेल्या विविध प्रकारच्या वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधुनिक काळाच्या ओघात स्मृतीत गेलेल्या ग्रामीण भागातील वैदूला आता शासनाच्या नवीन नियमामुळे भरभराटीचे दिवस येणार आहेत. गावच्या परिसरातील वनसंपदा ओळखून दिल्यास संबंधित वैदूला त्याचा चांगला मोबदला दिला जाणार आहे.ग्रामीण भागातील गायरानात सापडत असलेल्या विविध प्रकारच्या वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया उपयुक्त असल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे औषध तयार केले जाणार आहे. पूर्वी याच बिया आणि झाडपाल्याचे औषध वैदू देत होते. त्यांना कुठला झाडपाला उपयुक्त आहे, याची चांगली जाण होती. मात्र, जस जसा वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल होत गेला. तसा अनेक वैदूही काळाच्या ओघात मागे पडले. पूर्वीसारखं सध्या वैदूचं औषण कोणी घेत नाही. त्यामुळे अशा वैदूंना उदरनिर्वाहसाठी शहरी भागात यावे लागले होते. परंतु आता याच वैदूंना पुन्हा खेडेगावकडे आकर्षित व्हावे लागणार आहे.वनसंपदेची जवळून ओळख केवळ वैदूंनाच असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या कमिटीला वनसंपदा शोधताना वैदूंचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र, वैदूंचे ज्ञान मोफत न घेता त्यांना त्याचा मोबदलाही देण्यात येणार आहे.वनसंपदेतून मिळालेल्या पैशातून शासनस्तरावर तीन वाटण्या करण्यात आल्या आहेत. वनसंपदा संकलित करण्यात आलेला जमिनीचा मालक आणि माहितगार व्यक्ती म्हणजेचवैदू यांना यातील सगळ्यात मोठावाटा दिला जाणार आहे. तसेचउर्वरित तिसरा वाटा स्थानिकजैविक विविधता निधीत जमा करण्यात येणार आहे. तसेच या वैदूंशिवाय गावातील एखाद्या जाणकार व्यक्तीलाही जर वनसंपदेची माहिती असेल तर त्यालाही आर्थिक मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे.राज्यात सातारा जिल्हा परिषद अग्रेसरजैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी राज्यात सगळ्यात पहिल्यांदा केवळ सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाने केली आहे. शासनस्तरावरून अध्यादेश आल्यानंतर तातडीने या विभागाने संपूर्ण जिल्ह्यात १४९४ कमिट्या स्थापन केल्या. या कमिटीमध्ये सातजणांचा समावेश करण्यात आला आहे. गावच्या परिसरात सापडलेली वनसंपदा शोधून त्याच्या नोंदी ठेवणे हे काम या कमिटीला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची पुणे येथे यासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये केवळ सातारा जिल्हा परिषदेनेच यावर काम सुरू केले. त्यामुळे शासनाकडून सातारा जिल्हा परिषदेला कौतुकाचं पत्र देण्यात आलं आहे.