शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ वैदूूंना येणार आता भरभराटीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:47 IST

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधुनिक काळाच्या ओघात स्मृतीत गेलेल्या ग्रामीण भागातील वैदूला आता शासनाच्या नवीन नियमामुळे भरभराटीचे दिवस येणार आहेत. गावच्या परिसरातील वनसंपदा ओळखून दिल्यास संबंधित वैदूला त्याचा चांगला मोबदला दिला जाणार आहे.ग्रामीण भागातील गायरानात सापडत असलेल्या विविध प्रकारच्या वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधुनिक काळाच्या ओघात स्मृतीत गेलेल्या ग्रामीण भागातील वैदूला आता शासनाच्या नवीन नियमामुळे भरभराटीचे दिवस येणार आहेत. गावच्या परिसरातील वनसंपदा ओळखून दिल्यास संबंधित वैदूला त्याचा चांगला मोबदला दिला जाणार आहे.ग्रामीण भागातील गायरानात सापडत असलेल्या विविध प्रकारच्या वनसंपदेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया उपयुक्त असल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे औषध तयार केले जाणार आहे. पूर्वी याच बिया आणि झाडपाल्याचे औषध वैदू देत होते. त्यांना कुठला झाडपाला उपयुक्त आहे, याची चांगली जाण होती. मात्र, जस जसा वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल होत गेला. तसा अनेक वैदूही काळाच्या ओघात मागे पडले. पूर्वीसारखं सध्या वैदूचं औषण कोणी घेत नाही. त्यामुळे अशा वैदूंना उदरनिर्वाहसाठी शहरी भागात यावे लागले होते. परंतु आता याच वैदूंना पुन्हा खेडेगावकडे आकर्षित व्हावे लागणार आहे.वनसंपदेची जवळून ओळख केवळ वैदूंनाच असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या कमिटीला वनसंपदा शोधताना वैदूंचा आधार घ्यावा लागणार आहे. मात्र, वैदूंचे ज्ञान मोफत न घेता त्यांना त्याचा मोबदलाही देण्यात येणार आहे.वनसंपदेतून मिळालेल्या पैशातून शासनस्तरावर तीन वाटण्या करण्यात आल्या आहेत. वनसंपदा संकलित करण्यात आलेला जमिनीचा मालक आणि माहितगार व्यक्ती म्हणजेचवैदू यांना यातील सगळ्यात मोठावाटा दिला जाणार आहे. तसेचउर्वरित तिसरा वाटा स्थानिकजैविक विविधता निधीत जमा करण्यात येणार आहे. तसेच या वैदूंशिवाय गावातील एखाद्या जाणकार व्यक्तीलाही जर वनसंपदेची माहिती असेल तर त्यालाही आर्थिक मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे.राज्यात सातारा जिल्हा परिषद अग्रेसरजैविक विविधता कायद्याची अंमलबजावणी राज्यात सगळ्यात पहिल्यांदा केवळ सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाने केली आहे. शासनस्तरावरून अध्यादेश आल्यानंतर तातडीने या विभागाने संपूर्ण जिल्ह्यात १४९४ कमिट्या स्थापन केल्या. या कमिटीमध्ये सातजणांचा समावेश करण्यात आला आहे. गावच्या परिसरात सापडलेली वनसंपदा शोधून त्याच्या नोंदी ठेवणे हे काम या कमिटीला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची पुणे येथे यासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये केवळ सातारा जिल्हा परिषदेनेच यावर काम सुरू केले. त्यामुळे शासनाकडून सातारा जिल्हा परिषदेला कौतुकाचं पत्र देण्यात आलं आहे.