शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

मुलीच्या लग्नासाठीचा खर्च गावच्या विकासासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

कुडाळ: आज-काल लग्नसमारंभ थाटामाटात साजरा करण्यात अनेकांना धन्यता वाटते. आपला मोठेपणाचा अहंभाव मिरवण्यासाठी लग्नामध्ये वारेमाप खर्च करतात. या सर्वांना ...

कुडाळ: आज-काल लग्नसमारंभ थाटामाटात साजरा करण्यात अनेकांना धन्यता वाटते. आपला मोठेपणाचा अहंभाव मिरवण्यासाठी लग्नामध्ये वारेमाप खर्च करतात. या सर्वांना फाटा देत जावळी तालुक्यातील भालेघर गावच्या दिलीप नारायण पवार यांनी मुलीच्या लग्नासाठीचा येणारा अनावश्यक खर्च टाळून गावच्या विकासास हातभार दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, भालेघर येथील मुंबईस्थित दिलीप पवार यांच्या मुलीचा विवाह राजपुरी येथील दिलीप राजपुरे यांचे चिरंजीव रोहित यांच्याशी ठरविण्यात आला होता. दोन्ही कुटुंबीयांनी मुलांचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेऊन मुलांचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. लग्नातील वायफळ खर्च वाचवून पवार कुटुंबीयांनी गावच्या विकासासाठी २१,१११ रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला. मुलामुलींच्या हस्ते ही देणगी भालेघर उत्सव कमिटीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली. सामाजिक जाणिवेच्या दातृत्व भावनेतून गावच्या विकासासाठी वेगळा दृष्टिकोन बाळगून दिलीप पवार यांनी सामाजिक बांधीलकीचा आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

चौकट :

सामाजिक दरी दूर होण्यास मदत

लग्न समारंभात होणाऱ्या भरमसाट खर्चाला फाटा देत सामाजिक दायित्व दाखवून इतरांना नवी दिशा देणाऱ्या अशा विचारप्रवाहांची गरज आहे. यातूनच सामाजिक दरी दूर होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातही विकासाची दूरदृष्टी ठेवून भालेघर गावचे प्रतिष्ठित लोक समाजापुढे वेगळा आदर्श ठेवत नवीन विचारांची प्रेरणा देत आहेत.

फोटो :

०३कुडाळ

भालेघर येथील दिलीप पवार यांनी मुलीच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून नवदाम्पत्यांच्या हस्ते गावच्या विकासासाठी देणगी दिली. (छाया : विशाल जमदाडे)