शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढली

By admin | Updated: March 26, 2015 00:09 IST

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; पूर्वीच्या पाच हजारांवरून आता २५ हजारांपर्यंत खर्च करता येणार

सातारा : ‘ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांसाठीच खर्च मर्यादा वाढविण्यात आली असून, पूर्वीच्या पाच हजार रुपये खर्च मर्यादेवरून वाढवून ती आता २५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरलक्ष ठेवण्यात येणार आहे,’अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७१४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १६९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला २५ हजार रुपये इतकी खर्च मर्यादा देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये तर राखीव जागेवरील उमेदवाराला १०० रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी १६ हजार ५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.निवडणूक जाहीर झालेल्या गावांची आकडेवारी तालुकानिहाय अशी : सातारा : ४१, कोरेगाव : ५१, जावळी : ५६, कऱ्हाड : ९८, पाटण : ९५, वाई : ७१, महाबळेश्वर : २४, खंडाळा : ५५, फलटण : ७८, खटाव : ८८, माण : ५७ पोटनिवडणूक लागलेल्या गावांची आकडेवारी तालुकानिहाय अशी : सातारा : ३०, कोरेगाव : २८, जावळी : २८, पाटण : ४६, वाई : १०, महाबळेश्वर : २६, माण : १ या निवडणुकीसाठी ३ हजार ११४ मतदान यंत्रांची आवश्यकता असून, जिल्हा प्रशासनाकडे १ हजार १८८ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. १ हजार ९२६ मतदान यंत्रांची निवडणूक आयोगाकडे मागणी केली जाणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज १० एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. २३ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)कोरेगावचीही निवडणूक तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया नगरविकास विभागाने सुरु केली आहे. त्यावरील हरकती मागविल्या आहेत. तरीही कोरेगावची निवडणूक लागली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ‘मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. भविष्यात कोरेगावात नगरपंचायत झाल्यास पुन्हा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रिया केली जाईल,’ असे त्यांनी सांगितले.सरपंच आरक्षण सोडत १ एप्रिल रोजीजिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडती बुधवार, दि. १ एप्रिल रोजी होणार आहेत. या सोडती तालुकावार घेतल्या जातील. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही सोडत लागू राहणार आहे.जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यकग्रामपंचायतीसाठी राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने जात वैधता प्रमाणपत्र जोडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे. सहा महिने मुदत न मिळाल्यास राखीव जागांसाठी उमेदवारांची ओढाओढ होण्याची शक्यता आहे.सरपंच आरक्षण सोडत १ एप्रिल रोजीजिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडती बुधवार, दि. १ एप्रिल रोजी होणार आहेत. या सोडती तालुकावार घेतल्या जातील. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही सोडत लागू राहणार आहे.जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यकग्रामपंचायतीसाठी राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने जात वैधता प्रमाणपत्र जोडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे. सहा महिने मुदत न मिळाल्यास राखीव जागांसाठी उमेदवारांची ओढाओढ होण्याची शक्यता आहे.