शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:42 IST

ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे शेतशिवारासह कचºयाच्या ढिगाºयात फुटलेल्या बाटल्या, ग्रामस्थांना इजा होण्याची शक्यता

ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्ग आणि राज्यमार्ग यापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रस्त्याकडेची सर्व दुकाने बंद झाली आहेत. पण मद्यपिणाºयांना ती कोठून आणि कशी उपलब्ध करायची याचा ‘मार्ग’ चांगलाच माहित आहे. त्यामुळे दारूविक्री तसेच पिण्यास बंदी असून देखील ती त्यांच्याकडून पिली जात आहेत. मात्र, दारू मिळूनही ती पिण्यास जागाच उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडून रात्रीच्यावेळी अंधारात गाडी रस्त्याकडेला लावून शेतशिवारात जाऊन त्या ठिकाणी पिण्याचे कार्यक्रम करीत आहेत.

ही परिस्थिती सध्या ओगलेवाडी मार्गावर पहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला मद्यपानाचा कार्यक्रम संपल्यानंतर मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या  शेतशिवारात तसेच रस्त्याकडेला टाकून देत आहेत.

रात्रीच्यावेळी मद्यपींनी केलेल्या कार्यक्रमाचे परिणामी दिवसा शेतशिवारातील शेतकºयांना भोगावे लागत आहेत. शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्या पायांना बाटल्यांच्या फुटलेल्या काचा लागून त्यांना गंभीर दुखापत होत आहेत. त्यापासून सुटका मिळवित शेतकरी त्या रिकाम्या बाटल्या रस्त्याकडेला टाकत आहेत. 

मोकळ्या फुटलेल्या बाटल्या या रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला असलेल्या साईड पट्यांवर पडत असल्याने त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने जाऊन वाहने पंक्चर होत आहेत.