शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

‘घरगुती काँग्रेस’ला हद्दपार करा

By admin | Updated: February 12, 2017 22:28 IST

मदनदादा मोहिते : गोंदी येथे उमेदवार प्रचारार्थ सभा; सगळीच पदे घरात वाटून घेतली

कऱ्हाड : ‘मी मंत्री, तू आमदार, तू जिल्हाध्यक्ष, तू खजिनदार... अशी सगळी पदे घरातच वाटून घेणारी ‘घरगुती काँग्रेस’ कऱ्हाड तालुक्यात निर्माण झाली असल्यामुळे या काँग्रेसचा मी त्याग केला आहे. मतदारांनीही आता अशा ‘घरगुती काँग्रेस’ला कऱ्हाड तालुक्यातून कायमचे हद्दपार करा,’ असे आवाहन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते यांनी केले.गोंदी, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.याप्रसंगी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजपाच्या रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शामबाला बबन घोडके, शेरे पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब निकम, उपसरपंच किशोर पवार, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक लालासाहेब पवार, माजी उपसरंपच गुणवंतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य हणमंत मदने, प्रकाश कुंभार, गोंदी विकास सोसायटीचे उमेदवार विजय पवार, उपाध्यक्ष धर्मेंद्र माने, संचालक दिलीप पवार, रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करताना मदनदादा मोहिते म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणात मुरले आहेत. पण असले राजकारण या भागात चालत नाही. जनमत वाढविण्यासाठी लोकांत मिसळणे महत्त्वाचे आहे, असे वारंवार सांगूनही त्यांनी माझ्या सांगण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. केवळ निधी वाटून माणसे मागे येत नाहीत, हे आता त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.’मोहिते-भोसले मनोमिलनावर भाष्य करताना पुढे मोहिते यांनी स्पष्ट केले की, ‘आमच्या घराण्यात कर्तबगार मंडळी असूनही संघर्षामुळे घराण्याचे मोठे नुकसान झाले आहे. संघर्षात नेहमी दुसऱ्याचा फायदा होत असल्यानेच आम्ही दोन्ही कुटुंबांनी कटुता संपवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही आपापसातील मतभेद मिटवून भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसावी. भविष्यात आमदार होण्याची उमेद केवळ अतुलबाबांच्यात असून, त्यांना आमदार करणे हेच माझे ध्येय आहे.’ भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘केंद्र आणि राज्यपाळीवरून निधी खेचून आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही आपल्या विचारांचे लोक निवडून येणे गरजेचे आहे. निवडणूक तोंडावर आली तरी विरोधी आघाड्यांमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. गट कुणी लढवायचा आणि गण कुणी लढवायचा याबाबत संभ्रमावस्था आहे. चिन्हाचा तर अजून पत्ताच नाही. अशा परिस्थितीत भाजपाच्या उमेदवारांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असल्याने आपला विजय निश्चित आहे.’अर्जुन पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संदीप यादव यांनी सूत्रसंचालन केले. विजय पवार यांनी आभार मानले. गोंदी, शेरे या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)