शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

शाहूपुरी वगळून हद्दवाढीचा घाट!

By admin | Updated: May 20, 2016 22:50 IST

भाजपचा सर्व्हे : मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू; पक्षामार्फत चाचपणी

सातारा : मुंबईतून पाठविण्यात आलेल्या भाजपाच्या दोन प्रतिनिधींनी सातारा पालिकेच्या हद्दवाढीच्या विषयावर येथील विविध स्तरांतील नागरिक, तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कल जाणून घेतला. ही कल चाचणी मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते. चाचणीत प्रतिनिधींना संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्याचे समजते. शाहूपुरी वगळता हद्दवाढीचा भाजपकडून घाट घातला गेला आहे.सातारा पालिकेच्या हद्दवाढीचा विषय सध्या मुख्यमंत्र्यांपुढे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्तावित व प्रलंबित हद्दवाढीसंदर्भात कोणत्याही क्षणी अधिसूचना निघू शकते. अशी परिस्थिती आहे. साताऱ्याच्या हद्दवाढीबाबत निर्णय घेण्यापूर्वी सातारकरांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. त्याकरिता दोन प्रतिनिधीही साताऱ्यात मुंबईतून पाठविण्यात आले होते. या प्रतिनिधींनी सातारा शहर, तसेच प्रस्तावित हद्दीतील प्रमुख पदाधिकारी, नागरिकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शाहूपुरीस सातारा पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यास विरोध केल्याचे समजते. शाहूपुरी ही नगररचना विभागाच्या नियोजनानुसार वसलेली वस्ती आहे. रस्ते आणि भाजी मंडई याकरिता विशेष निधी शासनाकडून मिळाल्यास शाहूपुरीस नगरपालिकेची गरज नाही. त्याऐवजी शाहूपुरी नगरपंचायत करावी, अशी भूमिका काहींनी मांडल्याचे समजते. मात्र शाहूनगर, विलासपूर, पीरवाडी आदी भाग सातारा पालिकेत घेण्यास हरकत नाही, असे मतही काही पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे समजते. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने पालिकेचा प्रस्तावित हद्दवाढीचा प्रस्ताव शाहूपुरी वगळून मान्य करावा, अशी आग्रही मागणी केल्याचे सांगण्यात येते. मुंबईतून आलेल्या प्रतिनिधींनी कल चाचणीमध्ये शहरातील आणखी कोणत्या भागातील नागरिकांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली हे समजू शकले नाही. कल चाचणीमध्ये काही निष्कर्ष निघाला तरी मुख्यमंत्री खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तडकाफडकी निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास सातारा पालिकेचे पदाधिकारी व्यक्त करतात. या कल चाचणीनंतर मंत्रालयात हद्दवाढीच्या विषयावरील हालचालींना वेग आल्याचे समजते. हद्दवाढीच्या अधिसूचना काढताना मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) हरकतींबाबत काय निर्णय?सातारा शहरासह वाढीव हद्दीत डिसेंबरमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, तर ३१ मेपूर्वी हद्दवाढीची अधिसूचना निघणे गरजेचे आहे. या अधिसूचनेवर किमान एक महिना आधी हरकती, सूचना मागवाव्या लागतील. त्यानंतर साताऱ्याच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचना निघेल. या सर्वांकरिता मोजकाच कालावधी हातात आहे. ३१ मेपूर्वी प्रांरभिक अधिसूचना न निघाल्यास वाढीव हद्दीतील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.