शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

मोबाईलचा अतिवापर मुलांसाठी ठरतोय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST

कुडाळ : मोबाईल हे छोटेसे यंत्र आज सर्वांनाच निकडीची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलांसह वयोवृद्धांपर्यंत शिक्षण आणि ...

कुडाळ : मोबाईल हे छोटेसे यंत्र आज सर्वांनाच निकडीची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलांसह वयोवृद्धांपर्यंत शिक्षण आणि करमणुकीचे साधन बनला. मुलांना शालेय अभ्यास करताना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात शिक्षक वर्गालाही मदत झाली. मात्र, याचा अतिवापर हा आजच्या पिढीला घातक ठरू लागला आहे.

आजची पिढी ही आतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी आहे. परंतु ज्या वयात त्यांना मैदानाची गोडी लावायला हवी. अशा वयातच त्यांच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची किमया याला कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. अगदी लहान बाळापासूनच याची सुरुवात होत आहे. कळत न कळत या मोबाईलच्या हव्यासाची त्यांना सवय जडत आहे.

कोरोना काळात तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली. लहान-थोरांचे शिक्षण आणि काम याद्वारेच घरातून होत आहे. शिक्षकांनी मेहनत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना याच माध्यमातून अध्ययनप्रवण ठेवण्याचे कार्य केले. पण विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने याचा उपयोग कितपत केला हेही महत्त्वाचे आहे. पालकांनी याकडे जाणीवपूर्वक पाहिले का? हा प्रश्न आहे. कारण मोबाईलवर शिकण्याबरोबरच अन्य विषयांकडे मुले भरकटली गेली असल्याचाही तक्रारी समोर आल्या आहेत.

ज्ञानाची कवाडे उघडून आवश्यक ते ज्ञान उपलब्ध होण्याकरिता या छोट्याशा मोबाईलची मोठी मदत होत आहे. मात्र, आजची लहान पिढी या मोबाईलमध्ये रममाण होत एकलकोंडी होऊ लागली आहे. पालकांनी योग्य दक्षता घेत मुलांच्या मोबाईल वेडाला वेळीच आळा घालायला हवा.

परस्पर संवाद महत्त्वाचा

परस्पर संवादातून मुलांची मानसिकता आणि खेळाच्या माध्यमातून शारीरिक सुदृढता राखण्यात मदत होईल. याकरिता आवश्यक वापराव्यतिरिक्त मुलांना मोबाईलपासून परावृत्त करण्याची भूमिका पालकांनी बजावायलाच हवी.