शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

जास्तीचे पाणी वाढवू शकते किडनीचे विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गरजेपेक्षा अधिकचे पाणी शरीरात गेल्याने त्याचा थेट परिणाम किडनीवर होत आहे. शरीरात जास्त पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गरजेपेक्षा अधिकचे पाणी शरीरात गेल्याने त्याचा थेट परिणाम किडनीवर होत आहे. शरीरात जास्त पाणी गेल्यामुळे वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा निद्रानाशाचा त्रासही जाणवतो. अतिरिक्त पाण्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी-अधिक झाल्याचे दुष्परिणामही काहींना सहन करावे लागतात.

पाणी म्हणजे जीवन हे शालेय दिवसांपासून आपल्या मनावर बिंबवले जाते. पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. निरोगी शरीरासाठी चोवीस तासांत तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र ज्यांना प्रोस्टेट, हृदयरोग, मूत्रपिंडाच्या आजारांचा त्रास होतोय, अशांनी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात गेलेल्या पाण्याचा उपयोग निर्मितीसाठी, पचन, शोषण, रक्ताभिसरण, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन यातील विषारी पदार्थांचे विसर्जन आधी क्रिया होण्यासाठी अत्यावश्यक असते. वैद्यकीय गैरसमजामुळे अधिक पाणी पिण्याकडे काहींचा कल असतो. किडनी सुस्थितीत ठेवायची असेल, तर भरपूर पाणी पिणे हा त्यावरील उपाय असल्याचे गैरसमज आहेत. त्यामुळे शरीराच्या गरजेपेक्षा अधिकचे पाणी पिले जाते. यामुळे शरीराला फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येकाने आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी प्यावे, असे डॉक्टर सुचवतात. वजन आणि वय यावरही पाणी पिण्याचे प्रमाण अवलंबून असल्याचे ते सांगतात.

चौकट

किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती लिटर पाणी

नवजात १

बारा वर्षांपर्यंत ५

१६ ते ३० वर्षांपर्यंत २

३१ ते ४० वर्षांपर्यंत ३

४१ ते ६० वर्षांपर्यंत ४

६१ वषार्पेक्षा जास्त ४

शरीरात पाणी कमी पडले तर

प्रत्येकाने किती पाणी प्यावे हे वैद्यकीय अधिकारी ठरवू शकत नाही. मात्र अति किंवा कमी पाणी झाले, तर त्याचा शरीराला दुष्परिणाम सोसावा लागतो. पाणी कमी प्रमाणात पिले, तर मुतखडा होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर डीहायड्रेशन होऊ शकते. यामुळे व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. थोडी मेहनत केल्यावर ही लगेच दमायला होते, याचे कारण शरिरातील पाणी पातळी कमी झालेली असते. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शरीरात कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

शरीरात पाणी जास्त झाले तर

वैद्यकीय गैरसमजामुळे अनेकजण किडनीचे काम उत्तमप्रकारे चालावे म्हणून जास्त पाणी पितात. त्यामुळे चालताना त्रास होऊ शकतो. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे यामुळे किडनीवरही ताण येण्याची शक्यता असते. अधिक पाणी शरीरात गेल्याने वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो. याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही जाणवतो. निद्रानाशाच्या समस्येवर आहे जास्त पाणी पिणं काहीअंशी जबाबदार असतं.

कोट

मोठ्या व्यक्तींनी, तरुणांनी आणि ज्यांना काही आजार नाही अशांनी २४ तासांत तीन ते साडेतीन लिटर पाणी पिले पाहिजे. इतके पाणी पिल्याने मूतखडा होण्याची शक्यता कमी होते. बारीक कण लघवीवाटे निघून जातात. वय वाढल्यानंतर पाणी पिणे कमी करावे. वय वजन आणि आजाराचे स्वरूप यावर किती पाणी प्यावे, हे अवलंबून असते. हृदयविकाराच्या रुग्णांनी पाणी कमी पिले पाहिजे.

- डॉ. उदयराज फडतरे, सातारा