शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

सैनिकांचं गाव ‘अग्निपथ’च्या पाठीशी, महाराष्ट्रातील 'या' गावात प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य सैन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:22 IST

पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.

सातारा : केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शवत देशभरात हिंसक निदर्शने होत असतानाच सातारा जिल्ह्यातील मिल्ट्री अपशिंगे या गावातील माजी सैनिकांनी मात्र या योजनेला पाठिंबा दिलाय. ही अग्निवीरांची निवड म्हणजे शिस्तप्रिय, कठोर मेहनत, देशाप्रति आदर आणि माणूस म्हणून घडविणारी फॅक्टरी आहे. याला विरोध होतोय हे निषेधार्हच आहे.पाकिस्तानची संपत्ती नष्ट होत नाही, ती आपलीच संपत्ती आपण नष्ट करतोय, हे विसरू नका असे जाळपोळ करणाऱ्यांवर कॅप्टन उदाजी निकम यांनी कडक शब्दांत ताशरे ओढले. परंतु हळूहळू नागरिकांना ही योजना पटवून देणे गरजेचे होते. लोकांमध्ये जनजागृती झाली असती तर कदाचित या योजनेला विरोध झाला नसता, असं मतही निकम यांनी व्यक्त केले.

सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य सैन्यात आहे. त्यामुळे या गावची ओळखच मिल्ट्री अपशिंगे अशी आहे. पिढ्यानपिढ्या या गावातील प्रत्येक घरात कोणीतरी सैन्यात कार्यरत आहेच. अशा या सैनिकी वातावरण असलेल्या गावातील आजी-माजी सैनिकांचं अग्निपथ योजनेबाबत लोकमत टीमनं मत जाणून घेतलं. तेव्हा आजी-माजी सैनिक अग्निपथ योजनेविषयी भरभरून बोलले.निवृत्त कॅप्टन उदाजी निकम म्हणाले की, अग्निपथ योजनेला महाराष्ट्रात कुठेच विरोध नाही. मराठी माणूस समजदार आहे. आंध्र प्रदेशमध्ये या योजनेला तीव्र विरोध होतोय. त्याच कारण तेथील एका ॲकॅडमी चालकाच्या ७५ ॲकॅडमी आहेत. त्याच्या पोटावर गदा आली ना. तो माणूस लोकांना हे जाळा ते जाळ असं प्रवृत्त करत होता. हे सगळ तपासात समोर आलंय. आज लोकांना समजलं पाहिजे. देशाच्या हिताची गोष्ट आहे. तिथ तरी अशी कृत्ये केली नाही पाहिजेत. बरं आपण पाकिस्तानची बस जाळली नाही, ट्रेन जाळली नाही. आपलीच मालमत्ता आपण जाळतोय. हे कितपत योग्य आहे. आज पूर्वीसारखी आर्मी राहिली नाही. तसा आता बदल स्वीकारायला पाहिजे.

निवृत्त सुभेदार सुधीर कारंडे यांचही मत असंच आहे. ते म्हणताहेत, अग्निवीर हा एक अनुशाषित बनून परतणार आहे. शिस्तप्रिय बनेल. शिवाय त्यांना पॅकेजही चांगले आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर बदलेलच. पण इतर क्षेत्रातही त्यांना शासन नोकरीसाठी प्राधान्य देणार आहे. आमच्या गावामध्ये असलेले मुले सैन्यात भरतीसाठी सराव करत आहेत. त्यांना ही योजना नेमकी काय आहे, हे आम्ही समजून सांगत आहे. तसे इतर गावातील आजी-माजी सैनिकांनीही तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.निवृत्त सुभेदार संदीप निकम यांनी अग्निपथ योजना चांगली असल्याचे म्हटले आहे. गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने या योजनेला पाठिंबा दिला आहे. युवकांनी चांगली संधी साधून आली आहे. या संधीचं सोनं युवकांनी करावं. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना शासन इतर ठिकाणी सेवेत सामावून घेण्यासाठी योजना आखत आहे. अग्निपथ योजनेवर देशाच्या काही भागांत विरोध सुरू असला, तरी आम्ही एक गाव म्हणून याबद्दल सकारात्मक आहोत.

या गावाने ४६ सैनिक गमावले...

पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवान