शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सैनिकांचं गाव ‘अग्निपथ’च्या पाठीशी, महाराष्ट्रातील 'या' गावात प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य सैन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:22 IST

पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.

सातारा : केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध दर्शवत देशभरात हिंसक निदर्शने होत असतानाच सातारा जिल्ह्यातील मिल्ट्री अपशिंगे या गावातील माजी सैनिकांनी मात्र या योजनेला पाठिंबा दिलाय. ही अग्निवीरांची निवड म्हणजे शिस्तप्रिय, कठोर मेहनत, देशाप्रति आदर आणि माणूस म्हणून घडविणारी फॅक्टरी आहे. याला विरोध होतोय हे निषेधार्हच आहे.पाकिस्तानची संपत्ती नष्ट होत नाही, ती आपलीच संपत्ती आपण नष्ट करतोय, हे विसरू नका असे जाळपोळ करणाऱ्यांवर कॅप्टन उदाजी निकम यांनी कडक शब्दांत ताशरे ओढले. परंतु हळूहळू नागरिकांना ही योजना पटवून देणे गरजेचे होते. लोकांमध्ये जनजागृती झाली असती तर कदाचित या योजनेला विरोध झाला नसता, असं मतही निकम यांनी व्यक्त केले.

सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य सैन्यात आहे. त्यामुळे या गावची ओळखच मिल्ट्री अपशिंगे अशी आहे. पिढ्यानपिढ्या या गावातील प्रत्येक घरात कोणीतरी सैन्यात कार्यरत आहेच. अशा या सैनिकी वातावरण असलेल्या गावातील आजी-माजी सैनिकांचं अग्निपथ योजनेबाबत लोकमत टीमनं मत जाणून घेतलं. तेव्हा आजी-माजी सैनिक अग्निपथ योजनेविषयी भरभरून बोलले.निवृत्त कॅप्टन उदाजी निकम म्हणाले की, अग्निपथ योजनेला महाराष्ट्रात कुठेच विरोध नाही. मराठी माणूस समजदार आहे. आंध्र प्रदेशमध्ये या योजनेला तीव्र विरोध होतोय. त्याच कारण तेथील एका ॲकॅडमी चालकाच्या ७५ ॲकॅडमी आहेत. त्याच्या पोटावर गदा आली ना. तो माणूस लोकांना हे जाळा ते जाळ असं प्रवृत्त करत होता. हे सगळ तपासात समोर आलंय. आज लोकांना समजलं पाहिजे. देशाच्या हिताची गोष्ट आहे. तिथ तरी अशी कृत्ये केली नाही पाहिजेत. बरं आपण पाकिस्तानची बस जाळली नाही, ट्रेन जाळली नाही. आपलीच मालमत्ता आपण जाळतोय. हे कितपत योग्य आहे. आज पूर्वीसारखी आर्मी राहिली नाही. तसा आता बदल स्वीकारायला पाहिजे.

निवृत्त सुभेदार सुधीर कारंडे यांचही मत असंच आहे. ते म्हणताहेत, अग्निवीर हा एक अनुशाषित बनून परतणार आहे. शिस्तप्रिय बनेल. शिवाय त्यांना पॅकेजही चांगले आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर बदलेलच. पण इतर क्षेत्रातही त्यांना शासन नोकरीसाठी प्राधान्य देणार आहे. आमच्या गावामध्ये असलेले मुले सैन्यात भरतीसाठी सराव करत आहेत. त्यांना ही योजना नेमकी काय आहे, हे आम्ही समजून सांगत आहे. तसे इतर गावातील आजी-माजी सैनिकांनीही तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.निवृत्त सुभेदार संदीप निकम यांनी अग्निपथ योजना चांगली असल्याचे म्हटले आहे. गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने या योजनेला पाठिंबा दिला आहे. युवकांनी चांगली संधी साधून आली आहे. या संधीचं सोनं युवकांनी करावं. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना शासन इतर ठिकाणी सेवेत सामावून घेण्यासाठी योजना आखत आहे. अग्निपथ योजनेवर देशाच्या काही भागांत विरोध सुरू असला, तरी आम्ही एक गाव म्हणून याबद्दल सकारात्मक आहोत.

या गावाने ४६ सैनिक गमावले...

पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवान