शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सगळं ठीक होईल; तुम्ही शेतीचं बघा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 23:53 IST

दीपक शिंदे । सातारा : ‘राज्यात आणि जगात काय चाललंय? याबाबत सर्वांनी माहिती तर घेतली पाहिजेच; पण आपल्या शेतातील ...

दीपक शिंदे ।सातारा : ‘राज्यात आणि जगात काय चाललंय? याबाबत सर्वांनी माहिती तर घेतली पाहिजेच; पण आपल्या शेतातील पिकाचं काय ? ऊस जाणार का ? तोड होणार का ? गहू कसा पेरणार ? याबाबत तुम्ही काळजी करा. मुंबईत काय चाललंय? याचा फार विचार करू नका. तिथलं सगळं व्यवस्थित होईल,’ असा दुर्दम्य आशावाद शरद पवारांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी व्यक्त केला.कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचे कसब शरद पवारांकडे आहे. कधीही हार मानायची नाही, हे तर त्यांनी मनाशी पक्के ठरविलेलेच आहे. अनेक प्रसंगात त्यांचा हा धीरोदात्तपणा समोर आलाय. काही मिळतंय म्हणून हूरळून जाणे नाही तर काही मिळणार नाही म्हणून दु:ख करत बसणे नाही.जे पाहिजे ते मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला आहे. आजही त्यांची हीच मानसिकता अनेकांना प्रेरणादायक ठरते. मुंबईतील सर्व काही व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका, असा आशावाद यातूनच निर्माण झाला आहे.गावातील आणि गल्लीतील प्रत्येकजण आज कोणाचे सरकार होणार आणि कसे होणार? याबाबत चर्चा करतो आहे. त्यांनी चर्चा करावी; पण त्यामुळे आपल्या मूळच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्लाच शरद पवारांनी या निमित्ताने दिला आहे. राज्यात ज्या घडामोडी होताहेत, त्या होणारच आहेत. त्यामध्ये इतरांनी आपला वेळ घालविण्याची गरज नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी सोपविलेली आहे, ते लोक याबाबत निर्णय घेतील आणि चांगला निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.शरद पवारांनी जो आशावाद व्यक्त केला तो त्यांनी स्वत:च्या जीवनातही निर्माण केला आहे. ज्या आजाराच्या भीतीने माणूस अर्धा गारद होतो, अशा आजारावर मात करत डॉक्टरलाच धडकी भरविण्याचे काम पवारांनी केले होते. ‘या आजाराची भीती घालू नकोस, तुला पोहोचवूनच मी जाईन,’ असे त्यांचे वक्तव्य सर्वांनाच धक्कादायक होते.आजही राज्यात एवढ्या घडामोडी सुरू असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कºहाडात आले आणि प्रीतिसंगमावर नतमस्तक झाले.यशवंतरावांचे स्मृतिस्थळ ठरते ऊर्जास्त्रोतयशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी एखादं- दुसरी वेळ वेगळता हा कार्यक्रम कधीही चुकविला नाही. ज्यांनी राज्याची सुरळीत घडी बसविली, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देत ते मुंबईतील घडामोडींसाठी रवाना झाले; पण जाताना एक ऊर्जा घेऊन गेले. ‘तुम्ही काळजी करू, नका मुंबईतील सर्व काही ठीक होईल. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल,’ असा विश्वास व्यक्त केला.