शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

सगळं ठीक होईल; तुम्ही शेतीचं बघा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 23:53 IST

दीपक शिंदे । सातारा : ‘राज्यात आणि जगात काय चाललंय? याबाबत सर्वांनी माहिती तर घेतली पाहिजेच; पण आपल्या शेतातील ...

दीपक शिंदे ।सातारा : ‘राज्यात आणि जगात काय चाललंय? याबाबत सर्वांनी माहिती तर घेतली पाहिजेच; पण आपल्या शेतातील पिकाचं काय ? ऊस जाणार का ? तोड होणार का ? गहू कसा पेरणार ? याबाबत तुम्ही काळजी करा. मुंबईत काय चाललंय? याचा फार विचार करू नका. तिथलं सगळं व्यवस्थित होईल,’ असा दुर्दम्य आशावाद शरद पवारांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी व्यक्त केला.कोणत्याही परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचे कसब शरद पवारांकडे आहे. कधीही हार मानायची नाही, हे तर त्यांनी मनाशी पक्के ठरविलेलेच आहे. अनेक प्रसंगात त्यांचा हा धीरोदात्तपणा समोर आलाय. काही मिळतंय म्हणून हूरळून जाणे नाही तर काही मिळणार नाही म्हणून दु:ख करत बसणे नाही.जे पाहिजे ते मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला आहे. आजही त्यांची हीच मानसिकता अनेकांना प्रेरणादायक ठरते. मुंबईतील सर्व काही व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका, असा आशावाद यातूनच निर्माण झाला आहे.गावातील आणि गल्लीतील प्रत्येकजण आज कोणाचे सरकार होणार आणि कसे होणार? याबाबत चर्चा करतो आहे. त्यांनी चर्चा करावी; पण त्यामुळे आपल्या मूळच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्लाच शरद पवारांनी या निमित्ताने दिला आहे. राज्यात ज्या घडामोडी होताहेत, त्या होणारच आहेत. त्यामध्ये इतरांनी आपला वेळ घालविण्याची गरज नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी सोपविलेली आहे, ते लोक याबाबत निर्णय घेतील आणि चांगला निर्णय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.शरद पवारांनी जो आशावाद व्यक्त केला तो त्यांनी स्वत:च्या जीवनातही निर्माण केला आहे. ज्या आजाराच्या भीतीने माणूस अर्धा गारद होतो, अशा आजारावर मात करत डॉक्टरलाच धडकी भरविण्याचे काम पवारांनी केले होते. ‘या आजाराची भीती घालू नकोस, तुला पोहोचवूनच मी जाईन,’ असे त्यांचे वक्तव्य सर्वांनाच धक्कादायक होते.आजही राज्यात एवढ्या घडामोडी सुरू असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कºहाडात आले आणि प्रीतिसंगमावर नतमस्तक झाले.यशवंतरावांचे स्मृतिस्थळ ठरते ऊर्जास्त्रोतयशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी एखादं- दुसरी वेळ वेगळता हा कार्यक्रम कधीही चुकविला नाही. ज्यांनी राज्याची सुरळीत घडी बसविली, त्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देत ते मुंबईतील घडामोडींसाठी रवाना झाले; पण जाताना एक ऊर्जा घेऊन गेले. ‘तुम्ही काळजी करू, नका मुंबईतील सर्व काही ठीक होईल. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल,’ असा विश्वास व्यक्त केला.