शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी करणे प्रत्येकाची जबाबदारी : गुदगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

मायणी : माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड व प्लास्टिक ...

मायणी : माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड व प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या उपक्रमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाची जबाबदारी असून पारंपरिक ऊर्जा व रेनवॉटर हार्वेस्टिंग इमारतींच्या करात सवलत देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन सरपंच सचिन गुदगे यांनी केले.

मायणी येथे ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना, अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस यांसह विविध शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कार्य करीत असलेले कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आलेल्या इंदिरानगर भागात असलेल्या गटारीच्या बंदिस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

सातारा जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकसंख्येच्या वर असलेल्या सहा गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील मायणी हे एकमेव गाव आहे. या गावामध्ये शासनामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग हा महत्त्वपूर्ण घटक आहे.

चौकट :

प्लास्टिकविरोधी कारवाई करणार

ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या इमारतीमध्ये पारंपरिक ऊर्जा व सौरऊर्जेचा वापर तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या ग्रामस्थांना करांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.