शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST

सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरणाची गती मात्र वाढवणे गरजेचे आहे. कारण लस देण्याची ...

सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरणाची गती मात्र वाढवणे गरजेचे आहे. कारण लस देण्याची गती वाढविली नाही तर सर्वांना लस मिळण्यासाठी अजून वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना लस देण्यात येत आहे. जे कर्मचारी फ्रंटवर काम करत आहेत, अशा लोकांना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. सुरुवातीला तब्बल २५ हजार कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात लस घेण्याची वेळ आली, तेव्हा अनेकांनी माघार घेतली. दिवसाला १५० ते २१० जणांना लस दिली जात आहे. जिल्ह्यातून एकूण १६ केंद्रे असून, आता कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लस देण्याची केंद्रेही वाढविण्यात येणार आहेत.

चाैकट :

डोस उपलब्ध, मग गती का वाढत नाही

जिल्ह्यात सुरुवातीला ३० हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर पुन्हा १५ हजार डोस उपलब्ध झाले. सध्या १७ हजार १०० इतक्या लसी उपलब्ध आहेत. असे असताना लस घेण्याची गती वाढत नाही. याची मुख्य कारण म्हणजे लसीसंदर्भांत लोकांमध्ये असलेला संभ्रम. या संभ्रमामुळे लस घेताना अनेकजण विचार करत आहेत. ज्यांनी घेतली. त्यांना सतत विचारून भंडावून सोडत आहेत. तुमचा अनुभव कसा काय, काही रिॲक्शन येत नाही ना, अशा विनाकारण शंका उपस्थित करून स्वत:चा संभ्रम निर्माण करत आहेत.

चाैकट :

२१० जणांना जिल्ह्यात रोज लस दिली जात आहे.

२९,२२६ जणांना आतापर्यंत लस दिली.

कोट :

लसीची गती वाढविण्यासाठी आता १६ केंद्रांएवजी आणखी काही केंद्रे वाढविण्याचा विचार आहे. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल. सध्या फ्रंटवर काम करणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. डोसचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे. कोणालाही त्रास झाला नाही. नागरिकांनी अफवा पसरवून संभ्रम निर्माण करू नये.

- डाॅ. सुभाष चव्हाण,

जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

चाैकट :

दहा दिवसात ७५८ नवे रुग्ण

एकीकडे कोराेनाची लस उपलब्ध झाली असली तरी, दुसरीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गत दहा दिवसांत तब्बल ७५८ नवे रुग्ण आढळून आले असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांची बेफिकिरी याला कारणीभूत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना अनेकजण तोंडाला मास्क न लावताच फिरत आहेत. अशा लोकांवर खर तर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईल.

चाैकट :

रोज कुठल्या केंद्रावर किती लस