शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अखेर ‘तहसील’ परिसर झाला स्वच्छ !

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

विद्यार्थ्यांचा पुढाकार : कर्मचाऱ्यांनी घेतला मोकळा श्वास--लोकमतचादणका

वडूज : घाणीची दुर्गंधी व मोठेले डास यामुळे तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या व येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. १३) ‘तहसीलमध्येच डेंग्यूला आमंत्रण’ या असे वृत्त प्रसिद्ध केली होती. त्याचाच परिणाम तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ झाला आणि येथील कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नसल्याने हा परिसर वारंवार अस्वच्छ असतो. राज्यात डेंग्यूसदृश परिस्थितीत निर्माण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्या दालनात यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी जनजागृती बैठक पार पाडली. परंतु, याच दालनाच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य साठून डासांचे प्रमाण वाढले होते. याचाच परिणाम येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत होता. दुर्गंधीपासून आणि डासांपासून संरक्षणासाठी दिवसा पंखे व डास निर्मूलन अगरबत्ती लावून येथील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. याचाच फटका दस्तूरखुद्द तहसीलदार विवेक साळुंखे यांनाच बसला. पाच दिवसांपूर्वी तेच स्वत: तापाने आजारी होते. सलग चार दिवस रजेवर जाऊन त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर ते पुनश्च हजर झाल्यानंतर सर्वप्रथम तहसील परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.तहसील कार्यालय परिसरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालय दुरुस्ती तातडीने करणार असल्याचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)खराट्यांचा खडखडाट...सध्या स्वच्छता मोहीम वडूज परिसरात सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून खराटे विकत आणले आणि त्याचा वापर झाल्यानंतर शाळेस भेट दिले. त्यामुळे वडूज बाजारपेठेतील सर्व दुकानातील खराटे संपल्याने बाजारपेठेत खराट्यांचा खडखडाट जाणवू लागला आहे.ही ‘स्वच्छता मोहीम’ राबविताना छत्रपती शिवाजी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. या स्वच्छतेच्या कामी लागणारे खराटे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून आणून स्वच्छता केल्याने बाजारपेठेतेत गर्दी झाली होती.