शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

संकटातही ‘आरोग्य’ची घडी विस्कटलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी, आरोग्य विभागाची घडी मात्र अजूनही विस्कटलेलीच आहे. ...

सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी, आरोग्य विभागाची घडी मात्र अजूनही विस्कटलेलीच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर या विभागाचा गाडा हाकला जात असून, आरोग्याची परिपूर्ण माहिती असलेला एकही सक्षम अधिकारी या विभागात नाही. त्यामुळे संकटकाळात सातारकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

पालिकेतील आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, नियोजन, वसुली, आस्थापना आदी विभागांमध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणून आरोग्य विभागाकडे पाहिले जाते. शहर स्वच्छतेची जबाबदारी असल्याने या विभागाकडे कायमच सर्वांचे लक्ष असते. आता तर हद्दवाढीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा ताण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुमारे अडीच लाख लोकांचा भार आरोग्य विभागाला पेलावा लागत आहे.

आरोग्य हा महत्त्वाचा विषय असताना या विभागातील अधिकाऱ्यांची कमतरता वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. गतवर्षी पालिकेत घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाची गाडी कधी गतीने चाललीच नाही. ज्या अधिकाऱ्यांना ‘आरोग्या’चा अनुभव नाही, अशांवर या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने सातारकरांचे ‘आरोग्य’ अबाधित राखण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु आता कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे.

गतवर्षी आरोग्य विभागाने कोरोना काळात अत्यंत जबाबदारीने काम केले. आता संकट गंभीर असताना उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. कोरोना प्रतिबंधासह साथरोग, पावसाळ्यापूर्वी केली जाणारी ओढे, नाले स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण मोहीम, धूर फवारणी अशा अनेक बाबींचा यंदा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते. आरोग्याची पुरेपूर माहिती असणारा अधिकारी या विभागात नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. इतकेच काय, स्वच्छ सर्वेक्षण अभियान तसेच शासनाच्या इतर उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. एकूणच आरोग्याची गाडी रुळावर नसल्याने सातारकरांचे स्वास्थ्य मात्र बिघडत चालले आहे.

(चौकट)

कुणाच्या खांद्यावर... कुणाचे ओझे...

आरोग्य विभागाची अवस्था सध्या ‘कुणाच्या खांद्यावर... कुणाचे ओझे...’ अशी बनली आहे. ही परिस्थिती बदलणे आता गरजेचे आहे. ज्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे, त्यांना निलंबन काळातही शासनाकडून वेतन दिले जाते. त्या अधिकाऱ्यांचा व त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाने कुठे तरी उपयोग करून घ्यायला हवा. सध्या कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. स्वच्छतेपासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत पालिकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांवर अशा कामांची जबाबदारी सोपवली तरी, अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.

लोगो : सातारा पालिकेचा फोटो