शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संकटातही ‘आरोग्य’ची घडी विस्कटलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी, आरोग्य विभागाची घडी मात्र अजूनही विस्कटलेलीच आहे. ...

सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी, आरोग्य विभागाची घडी मात्र अजूनही विस्कटलेलीच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर या विभागाचा गाडा हाकला जात असून, आरोग्याची परिपूर्ण माहिती असलेला एकही सक्षम अधिकारी या विभागात नाही. त्यामुळे संकटकाळात सातारकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

पालिकेतील आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, नियोजन, वसुली, आस्थापना आदी विभागांमध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणून आरोग्य विभागाकडे पाहिले जाते. शहर स्वच्छतेची जबाबदारी असल्याने या विभागाकडे कायमच सर्वांचे लक्ष असते. आता तर हद्दवाढीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा ताण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुमारे अडीच लाख लोकांचा भार आरोग्य विभागाला पेलावा लागत आहे.

आरोग्य हा महत्त्वाचा विषय असताना या विभागातील अधिकाऱ्यांची कमतरता वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. गतवर्षी पालिकेत घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाची गाडी कधी गतीने चाललीच नाही. ज्या अधिकाऱ्यांना ‘आरोग्या’चा अनुभव नाही, अशांवर या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने सातारकरांचे ‘आरोग्य’ अबाधित राखण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु आता कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे.

गतवर्षी आरोग्य विभागाने कोरोना काळात अत्यंत जबाबदारीने काम केले. आता संकट गंभीर असताना उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. कोरोना प्रतिबंधासह साथरोग, पावसाळ्यापूर्वी केली जाणारी ओढे, नाले स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण मोहीम, धूर फवारणी अशा अनेक बाबींचा यंदा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते. आरोग्याची पुरेपूर माहिती असणारा अधिकारी या विभागात नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. इतकेच काय, स्वच्छ सर्वेक्षण अभियान तसेच शासनाच्या इतर उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. एकूणच आरोग्याची गाडी रुळावर नसल्याने सातारकरांचे स्वास्थ्य मात्र बिघडत चालले आहे.

(चौकट)

कुणाच्या खांद्यावर... कुणाचे ओझे...

आरोग्य विभागाची अवस्था सध्या ‘कुणाच्या खांद्यावर... कुणाचे ओझे...’ अशी बनली आहे. ही परिस्थिती बदलणे आता गरजेचे आहे. ज्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे, त्यांना निलंबन काळातही शासनाकडून वेतन दिले जाते. त्या अधिकाऱ्यांचा व त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाने कुठे तरी उपयोग करून घ्यायला हवा. सध्या कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. स्वच्छतेपासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत पालिकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांवर अशा कामांची जबाबदारी सोपवली तरी, अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.

लोगो : सातारा पालिकेचा फोटो