शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

यमदूत दडलेत खांबाआड!

By admin | Updated: July 10, 2014 00:36 IST

भररस्त्यात अडथळे : किचकट, खर्चिक प्रक्रियेमुळे पालिका हतबल; हवे ‘महावितरण’चे साह्य

राजीव मुळ्ये ल्ल सातारा लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली; पण रस्ते तेवढेच राहिल्याने रस्त्यांचा श्वास घुसमटला. यातच आणखी एक विचित्र अडथळा शहराच्या अनेक भागांमध्ये सामोरा येत आहे. विजेचे आणि दूरध्वनीचे अनेक खांब रस्त्यांच्या मध्येच उभे आहेत. गंमत म्हणजे या खांबांच्या दोन्ही बाजूंनी डांबरीकरण झाले आहे; पण खांब काढण्याची, अन्यत्र हलविण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्यामुळे दिसणारे विनोदी दृश्य बऱ्याच वेळा धोकादायक ठरत आहे. शहरात एकेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर मुख्य दोन रस्त्यांचे जोडरस्ते अधिक प्रमाणात उपयोगात आले. रविवार पेठेतील लोणार गल्ली हा त्यापैकी एक रस्ता होय. या रस्त्याचे डांबरीकरण झाले; परंतु जुन्या खांबांनी आपली जागा सोडली नाही. परिणामी, वाढत्या रहदारीचा त्रास टाळण्यासाठी दुचाक्या खांबांच्या मागून सुसाट धावू लागल्या आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागले. या पेठेतील नागरिकांनी खांब हलविण्याची मागणी बरीच लावून धरली. ती नुकतीच पूर्ण झाली आणि या पेठेतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रस्त्यातील खांब काढल्याने वाहतुकीला अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला, हा दुसरा फायदा! परंतु, स्थानिकांनी मागणी केली तरच खांब काढायचे, असा जणू नियम असल्याप्रमाणे शहराच्या अन्य भागांत रस्त्यात येणारे खांब अजून जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. गोडोली, सदर बझार, शाहूपुरीकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी खांबांची समस्या दिवसेंदिवस धोका वाढविते आहे आणि या धोक्याकडे कोणाचेच लक्ष नाही. विशेषत: कोटेश्वर मैदानाकडून अर्कशाळेसमोरून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुने खांब अशा ठिकाणी आहेत, की ते जर आणखी थोडे मध्ये असते, तर त्यांनी दुभाजकाची भूमिका पार पाडली असती. या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी भीषण अपघातात एक बळीही गेला आहे. खांबांच्या अलीकडून वाहने येणार नाहीत, असे समजून पादचारी चाललेले असतात; पण दुचाक्या त्यांचा अपेक्षाभंग करीत अचानक समोरून किंवा मागून येतात. शिवाय, मोठ्या वाहनांना ओलांडून पुढे जाताना खांबांच्या पलीकडील भागाचा वापर दुचाकीचालकांकडून केला जातो. नवखा चालक असल्यास अचानक दिसणाऱ्या खांबामुळे नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. काही मुख्य रस्ते आणि असंख्य गल्लीबोळांत खांब रस्त्याच्या मधोमध आहे. नव्याने गल्लीत प्रवेश करणाऱ्या चालकाला, विशेषत: रात्रीच्या वेळी अचानक खांब समोर दिसल्यास काय करावे हे कळत नाही. पादचाऱ्यांनाही अंधारात बऱ्याच वेळा खांब दिसत नाही. या खांबांवर किमान रेडियमच्या पट्ट्या तरी एव्हाना लागायला हव्या होत्या. परंतु, तेही झाले नसल्याने अनर्थ ओढावण्याची वाट पाहिली जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. सदर बझारमधील अनेक रस्त्यांवर ही समस्या आ वासून उभी आहे. गोडोलीत अशीच स्थिती काही रस्त्यांवर आहे. शेटे चौकातून उत्तरेकडे जाणाऱ्या उताराच्या अरुंद रस्त्यावर अशाच प्रकारे खांब मधोमध उभा आहे. या रस्त्यावर दुचाकी वाहने आणि रिक्षांना येण्या-जाण्यास अडथळा होत असून, रात्री-अपरात्री खांब न दिसल्यास अपघात संभवतो शहरात जे रस्ते नव्याने झाले, त्यावरील खांब हलविण्यासाठी जवळपास ५० लाख रुपये पालिकेने वीज वितरण कंपनीकडे भरले. हे खांब उभे करताना पालिकेला विचारले गेले नाही; पण हलविताना मात्र पालिकेने पैसे भरायचे, हा नियम! रस्त्यांच्या बजेटमधून केवळ खांब दूर करण्यासाठी पालिका किती रक्कम भरू शकणार? याविषयी वीज कंपनीनेही सहकार्याचे धोरण ठेवले पाहिजे. अखेर तीही नागरिकांना सेवा पुरविणारी संस्था आहे. - अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका